Home विदर्भ बंगाली समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध- खासदार अशोक नेते यांचे सुभाषग्राम येथील...

बंगाली समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध- खासदार अशोक नेते यांचे सुभाषग्राम येथील बंगाली समाजाचे बैठकीत प्रतिपादन

255

राजेंद्र पाटील राऊत

बंगाली समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध-
खासदार अशोक नेते यांचे सुभाषग्राम येथील बंगाली समाजाचे बैठकीत प्रतिपादन
   गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)    

बंगाली समाज 40 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात वहिवाट करीत आहे मात्र त्यांना वनजमिनीचे पट्टे देतांना 75 वर्षाची अट घातलेली आहे. तसेच अन्य कागदपत्रे घेतांनाही त्यांना अनेक अडचणी येत आहेत. यात तोडगा काढण्यासाठी आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू व बंगाली बांधवांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांनी केले. चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथे आयोजित बंगाली समाजाच्या छोटेखानी बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे आदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम म्हणाले मा.पालकमंत्री व राज्यमंत्री राजे अम्ब्ररीशराव जी आत्राम व खा. अशोक जी नेते साहेब यांच्या नेत्रुत्वात मुलचेरा येथील 23,चामोर्शी येथील 23 व आरमोरी तालुक्यातील 2 अश्या 48 गावांतील बंगाली समाजाच्या घराचे मोजमाप करुन प्रापर्टि कार्ड देउन बंगाली समाजाला न्याय दिला आहे जो न्याय 1960 पासुन काॅग्रेस सरकारने बंगाली समाजाला न्याय दिला नाही .1991 मध्ये बंगाली समाजाला विश्वासात न घेता ते राहत व कसत असलेली महसुलची जमीन वन विभागात कनवर्ट केली व 2006 ला वनहक्क जमीनीचे पट्टे देण्या बाबत कायदा करताना काॅग्रेस सरकारने 1964 ला आलेल्या बंगाली समाजालाही 75 वर्षाची अट लावली म्हणून अतिक्रमीत वनजमीचे पट्टे बंगाली समाजाला मिडत नाहि.मा.खासदार अशोक जी नेते यानी लोकसभेत 75 वर्षाची अट शितील बाबत प्रश्न उपस्थित केला आहे. हा प्रश्न मार्गी लागला तर ओबिसी,एस.सी.बंगाली सर्व समाजाला न्याय मिळेल. यावेळी प्रमुख पाहूने म्हनुन् जिल्हा भाजपा महामंत्री रवींद्र ओलालवार, भाजयुमो चे प्रदेश सदस्य स्वप्निल वरघंटे, अखिल भारतीय बंगाली समाजाचे अध्यक्ष दिपकजी हलधर, इंदिरा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य बेपारी, चामोशी तालुका अध्यक्ष दिलीपजी चलाख, माजी उपसभापती आकुलीताई बिश्वास, सतीश राय, व बंगाली समाज बांधव उपस्थित होते.

Previous articleनगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे वा नगरसेविका शितल नाना काटे यांच्या पाठपुराव्याने काम पूर्ण
Next articleआताची मोठ्ठी बातमी…!! उद्यापासून बदलणार नियम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.