Home युवा मराठा विशेष बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिवीर संगोळी रायन्ना पुतळ्याची विटंबना करणाऱ्या...

बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिवीर संगोळी रायन्ना पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. यासाठी देण्यात आली निवेदन.

438

राजेंद्र पाटील राऊत

बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिवीर संगोळी रायन्ना पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. यासाठी देण्यात आली निवेदन.
गुलबर्गा जिल्हा प्रतिनिधी यशवंतराव सूर्यवंशी
कर्नाटक राज्याची राजधानी बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली. समाजात तेढ निर्माण व्हावी, समाजामध्ये अशांतता निर्माण व्हावी या उद्देशाने काही समाजकंटकांनी असे कृत्य केले असून अशा या भ्याड कृत्याचा निषेध कर्नाटक क्षेत्रीय मराठा परिषद बेंगलोर,यांचे राज्य उपाध्यक्ष श्री सूर्यकांत कदम, गुलबर्गा जिल्हा मराठा क्षेत्रीय परिषद, गौरव अध्यक्ष श्री दिनकर मोरे, जिल्हाध्यक्ष रामचंद्र जगदाळे, जनरल सेक्रेटरी राजू काकडे, दिलीप पवार, यशवंतराव सूर्यवंशी, श्रीकांत जाधव, सहदेव भोसले, कैलास मोरे, रवी वाडेकर, रमेश चीचकोटे, भिमराज वाघमारे, अनिल मोरे, अभिनय फाळके, गुंडप्पा कोडली, सह मल्लिकार्जुन यांनी बेंगलोर येथे झालेल्या महापुरुषांच्या विटंबनेचा जोरदार निषेध करत गुलबर्गा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना निवेदन देऊन या विटंबनेत सामील होणाऱ्या समाजकंटकांचा विरुद्ध कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली.

Previous articleसिरोंचा नगर पंचायतचा विकास रॅकेटच्या वेगाने करू: माजी आमदार दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार
Next articleमालेगांव तालुक्यातील गटसचिवांचा निवडणूकांवर बहिष्कार -भरत खैरनार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.