राजेंद्र पाटील राऊत
मोबाईलच्या नादात बावचळून गेली दुनिया सारी,लाईक कमेंट व स्टेटस वर सेल्फी च्या नादाने तरुणाई ग्रासली !
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे/ युवा मराठा न्युज नेटवर्क
सोशल मीडियामुळे जग जवळ आले परंतु माणसा माणसात दुरावा वाढत चालल्याने आजचे तरुणाई कमेंट स्टेटस जास्त महत्त्व देत असल्यामुळे मानसिक दृष्ट्या आरोग्य त्यांच्याबरोबर उज्ज्वल भविष्यही धोक्यात आलेले आहे
साधारण तीन बाय असाच चार इंचाच्या डिस्प्लेवर विश्व ची माहिती सहज उपलब्ध होते परंतु सोशल मीडिया क्रांतीमुळे अनेक जण त्यात बुडाल्याने माणूस उपचार तज्ञांकडे जाणाऱ्या रुग्णांची संख्येत वाढ होत आहे
यामध्ये स्टेटस कमेंट लाईक कमी मिळाल्यामुळे मनात गुंता वाढत आहे लाईफ मुळे फसवणूक आर्थिक नुकसान विश्वासघात चिडचिड होणे चिंता निराशेत भर पडत असल्यामुळे मानसिक आरोग्य बरोबर उज्वल भवितव्य ही तरुण पिढीचे धोक्यात व आधांतरी होण्याची शक्यता वाढत चाललेली आहेहिस्ट्री इंस्टाग्राम फेसबुक जास्तीत जास्त प्रसिद्धी होण्यासाठी हल्लीची तरुण पिढी जीव धोक्यात घालून सेल्फी व व्हिडिओ अपलोड करीत आहे अपलोड करण्याच्या नादात अनेकांचे जीव गेल्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर बघावयास मिळत आहे
व्हच्युअल लाइफ जगण्या पेक्षा सोशल लाईफ जगण्याची गरज आजच्या तरुण पिढीला असून तरुणांनी मोबाईल गेम खेळापेक्षा मैदानी खेळ खेळावे त्यांची गरज आजच्या तरुण पिढीला आहे