Home नांदेड देगलूर येथे शेतकऱ्यांचा चक्काजाम आंदोलन यशस्वी             ...

देगलूर येथे शेतकऱ्यांचा चक्काजाम आंदोलन यशस्वी               

193
0

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर येथे शेतकऱ्यांचा चक्काजाम आंदोलन यशस्वी                                                      देगलूर,( संजय कोकेंवार  प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)देगलूर येथे काल दिनांक 6 फेब्रुवारी रोजी नांदेड ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी दोन तास सर्व वाहने थांबवून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन सर्व पक्षाच्या वतीने करण्यात आले असून, शेतकरी विरोधी तीनही काळे कायदे तत्काळ रद्द करा, शेतकऱ्यांना शेतमालाचा हमीभाव कायदा लागू करा, व शेतकरी विकासाची धोरणे राबवा. अन्यथा खुर्च्या खाली करा. या घोषणेने संपूर्ण देगलूर शहर दणाणून गेले होते. मागील 74 दिवसांपासून दिल्ली येथे चालू असलेल्या किसान आंदोलनाला संपूर्ण देशभर चक्काजाम आंदोलनाची हाक दिली गेली. याला प्रतिसाद देत देगलूर येथे शेतकरी व विविध पक्षाच्या वतीने चक्काजाम करण्यात आला होता. या चक्काजाम मध्ये सर्व विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते ॲडव्होकेट मोहसिन अली, शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील,प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख कैलाश येसगे कावळगावकर, संभाजी बिग्रेडचे जिल्हाप्रमुख श्याम पाटील कुशा वाडीकर, काँग्रेसचे दीपक शहाणे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील, डॉ.उत्तम हिंगोले, बालाजी मैलागिरे, संजय जोशी, बाबुराव मिनकीकर, दिपक रेड्डी, वैभव पाटील, व असंख्य कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleनरखेड येथे पोलिस भरती पुर्व पुस्तके वाटप         
Next articleउत्तराखंडमधील दुर्दैवी घटणेत १५० जण बेपत्ता त्यापैकी १० मृतदेह सापडली
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here