![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2024/04/IMG-20240428-WA0052.jpg)
![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20240114-WA0024.jpg)
*महाराष्ट्राची लाडकी लालपरी कर्जासाठी गहाण ठेवणार*
*युवा मराठा न्यूज*
महाराष्ट्राची लाडकी लालपरी आणि
आशिया खंडात एक नंबर असणारी एसटी.ला आज कर्जासाठी आपली जागा गहाण ठेवावी लागली आता ही बाब एसटीला तारक आहे की मारक येणारा काळ सांगेल पन असा निर्णय शिवसेनेची सत्ता असतांना तरी घेणे अपेक्षित नव्हते . एकी सेवा करणारी बुन्हमुंबईपालिका यांच्या कर्मचाऱ्यांना १७००० बोनससाठी मा.मुख्यमंत्री महोदय आदेश देतात आणि दुसरीकडे एसटी . या विषयावर एक शब्दही बोलायला तयार नाहीत. परिवहन विभागाचाच एक भाग असलेला आर.टी.ओ.विभाग महसुल थांबलेला असुनही यांचे आजपर्यत वेतन रोखले नाही पन याच कोरोनाकाळात रेल्वेसेवा बंद असतांना आमचा एसटी.चा कामगार थेट बांगलादेश बाँर्डरपर्यत जाऊन आला याचा सोयरसुतक राज्यसरकारला नसाव हेच मोठे दुर्दैव आहे.
आज लोकल बंद असतांना मुंबईकरांच्या मदतीला धावून आला तो एसटी. कामगार पगाराला पैसा नाही म्हणायच आणि एकीकडे लोकोपयोगी सेवा जाहीर करायचे कश्याला सरकार हे दुतोंडीपना करता आहे राज्यात ५०/५२ महामंडळ आहे ज्यांच एक रूपया उत्पन्न नसतांना त्यांचे कर्मचारी दुप्पटदाम पगार घेत आहे आणि एसटीचा १०/१५ सेवेचा कामगार आजही १६००० च्या वर वेतन घेत नाही .आज कपाशी वेचणारा मजुरवर्ग ५०० रूपये रोज कमावत आहे. आणि एस.टी.कामगार राज्यसरकारचा शिक्का लावून बसलेला एस.टी. कामगार खऱ्या अर्थाने वेठबिगार ठरत आहे .
मान्य आहे एस.टी. जगली पाहीजे ,उत्पन्न आले पाहीजे पन याचा पाया जर राज्यसरकार आणि एसटी. संचालकांना जमत नसेल तर राज्यसरकारचा हस्तक्षेप बंद करून दोन तीन विभाग करून टाका एसटीचे करून टाका खाजगीकरण किमान खाजगीवाला तरी व्यवस्थीत चालवल एसटीला..सन २००० चा काळ एसटीच्या वाईट परिस्थीतीत १४००रूपयात राबला एसटी.चा कामगार , एसटी. कामगाराने बसगाड्या घेऊन दिल्यात आणि आज दोन चार महिने संकट काय ओढावल तर लगेच कर्ज!
बर ते संकट काय फक्त एसटी.वरच आहे का अख्ख्या जगावर संकट असतांना कोणत्या विभागाने कर्ज घेतले , किती लोकप्रतिनिधींनी पगार नाकारला , घरी बसुन लाख लाख पगार घेतले आणि एसटी कर्मचारी तीन महिने पगारापासुन वंचीत राहत असेल तर हे सरकारच दुर्दैव .
एसटी.त कामगारांच भविष्य नाही असच दिसतय कारण राज्यसरकार एसटीला जगू देणार नाही आणि मरूहु देणार नाही ??
कोल्हापूर जिल्हाप्रतिनिधी