देगलूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत देगलूर,(संजय कोकेंवार तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज )-देगलूर तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून सतत पावसामुळे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नदी, नाले ,तलाव, तुडुंब भरून वाहत आहेत काल अति पावसामुळे देगलूर ते उदगीर रस्ता करडखेड जवळील पुलावरून पाणी जात असल्यामुळे जवळपास दोन तास रस्ता बंद होता. तसेच देगलूर ते नांदेड हा रस्ता वझरगा गावाजवळील नदीवरून पाणी जात असल्यामुळे तो पण रस्ता जवळपास दोन तास बंद होता. तालुक्यातील नदीकाठील शेतांचे व पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, त्या पिकांचे लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी.अशी आम जनतेची मागणी जनतेतून होत आहे.कारण गेल्या पावसामुळे मूग व उडीद या पिकांना मोड फुटून पूर्णपणे वाया गेले होते. त्यात परत या पावसामुळे राहिलेल्या पिकांचे कापूस, सोया, तुर,असे सर्व पिकांचे परत नुकसान झाले असून या तालुक्यातील सर्व शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून हा तालुका पूर्णपणे ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा. अशी या तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांची मागणी आहे.