![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2024/04/IMG-20240428-WA0052.jpg)
![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20240114-WA0024.jpg)
नामपूरहून दोधेश्वर येथे जातांना कोळीपाडा येथील दोध्याड नदीवरील फरशी पुल दुर्दशा👆 सटाणा,(जगदिश बधान तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- कोळीपाडा हे बागलाण तालुक्यातील नामपुर पंचक्रोशीतील आदिवासी लोकवस्तीचे गाव आहे. नामपूरहून दोधेश्वर येथे जाताना कोळीपाडा गावालगत असलेला फरशी पुल मागच्या वर्षी पावसाने भगदाड पडून वाहून गेला. दोध्याड नदीवरील या पुलाला स्थानिक भाषेत’ कुंडाचा फरशी पुल’म्हणतात.पुलाच्या वरील बाजुस म्हसोबा मंदिर व पाण्याचे कुंड आहे.आज एक वर्ष होऊनही त्या पुलाची कोणतीही दुरुस्ती झालेली नाही. कोळीपाडा ग्रामस्थांना नामपुर येथे बाजारपेठ असल्याने दररोज जावे लागते.दवाखाना,कृषी उत्पन्न बाजार समिती येथे येजा सुरू असते.या रस्त्याने शेतमाल वाहनाने घेऊन जाणे अवघड असते. कोरोनाने या वर्षी दोधेश्वर येथील शिवमंदिर बंद असले तरी पर्यटकांना या रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहन घेऊन जातांना कसरत करावी लागते.भविष्यातील गर्दीचा रस्ता आहे.सध्या शिवमंदिर बंद असले तरी या मार्गाने अनेक पर्यटक कोळीपाडा, दोधेश्वर येथील डोंगर परिसरातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येतात.नामपुर-दोधेश्वर रस्त्यावर खड्डे पडले असून या पुलाचे काम व्हावे यासाठी ग्रामस्थ सातत्याने मागणी करत आहेत. वारंवार मागणी करूनही लोकप्रतिनिधी आमदार,खासदार यांनी या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. या रस्त्याचे व फरशी पुलाचे लवकरात लवकर काम सुरू करावे अशी मागणी कोळीपाडा ग्रामस्थ व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते महादू गातवे, चिंतामण गातवे,खंडू गातवे,भारत गातवे,विष्णू गातवे,राजु गुमाडे, अनिल गातवे,बंडू गातवे,शरद गातवे,विष्णू गुमाडे,गोरख गातवे,बन्सीलाल जाधव,विठ्ठल गातवे,रतन जाधव,अशोक गातवे,जिभाऊ गातवे,भुषण गातवे,वाळू गातवे यांनी केली आहे.