केरळ विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव –
विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे
मुंबई, ८ – केरळमधल्या कोझिकोड विमातळवर एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात (Air India Express Crash) झाला आहे. या भयंकर अपघातात वैमानिकासह 3 जण ठार झाल्याचं वृत्त आहे. तर 32 जण जखमी झाले आहेत. अपघातात जीव गमावलेले पायलट दीपक वसंत साठे हे महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे. ते NDA मध्ये कार्यरत होते.विमान धावपट्टीवर उतरत होतं, तेव्हा प्रचंड पाऊस सुरू होता. केरळमध्ये गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस सुरू आहे. धावपट्टीवरून विमान घसरलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे. याच अपघातात दीपक साठे या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा मृत्यू झाला.
एअर इंडियाचं हविमान रनवेवरून घसरलं असून विमानाला मोठ नुकसान झालं आहे. या विमानात 170 प्रवासी होते. दुबईहून हे विमान कोझीकोडला आलं होतं. IX 1344 हे विमान होतं. कोझिकोड इथे धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला. ‘वंदे भारत मिशन’च्या अंतर्गत हे विमान दुबईहून भारतात येत होतं.
दरम्यान, कोझिकोड विमानतळ हे टेबल टॉप एअरपोर्ट आहे. त्यामुळे इथे विमान उतरत असताना धावपट्टीवर खूपच काळजीपूर्वक उतरवावं लागतं. त्यात इथे पाऊस होता. त्यामुळे कदाचित पायलटला अंदाज आला नसावा. त्यामुळे 30 फूट खाली ते घसरलं आणि त्यातून हा अपघात झाला.