Home Breaking News कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे* *हजारो नागरीक स्थलांतर .* कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ...

कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे* *हजारो नागरीक स्थलांतर .* कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज

99
0

*कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे*
*हजारो नागरीक स्थलांतर .*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)

कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 23 गावांमधील 1750 कुटुंबातील 4413 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
स्थलांतरीत कुटुंबांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे गडहिंग्लज बाधित गावांची संख्या 2, 5 कुटुंबातील 21 व्यक्ती, 14 जनावरे. पन्हाळा- बाधित 2 गावातील 3 कुटुंबातील 14 व्यक्ती एका जनावरासह स्थलांतर झाले आहे. करवीर- 3 बाधित गावांमध्ये 1603 कुटुंबातील 3850 व्यक्ती आणि 1038 जनावरे स्थलांतरीत करण्यात आले आहेत. गगनबावडा -बाधित 8 गावांमधील 21 कुटुंबातील 68 व्यक्तींचे स्थलांतर झाले आहे. आजरा तालुक्यातील सुळेरानमधील 1 कुटुंबातील 9 व्यक्तींचे स्थलांतर झाले आहे. चंदगड- बाधित 6 गावातील 97 कुटुंबातील 377 व्यक्ती 47 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 20 कुटूंबातील 74 नागरिकांना दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.
अशा जिल्ह्यातील एकूण 23 गावांमधील 1750 कुटुंबातील 4413 व्यक्तींना आणि 1100 जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

Previous articleदेवळा तालुक्यात बिबटयांच्या धुमाकुळने नागरिकात भितीचे वातावरण  (भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क
Next articleसरकारने कोविड-कोविड करणं थांबवावं; १० तारखेनंतर लॉकडाऊन पाळणार नाही: प्रकाश आंबेडकर – विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here