Home Breaking News   *केंद्राने शैक्षणिक धोरण* *राबवण्याची* *घाई करू नये.*

  *केंद्राने शैक्षणिक धोरण* *राबवण्याची* *घाई करू नये.*

91
0

*केंद्राने शैक्षणिक धोरण* *राबवण्याची* *घाई करू नये.*
*सचिन सुर्यवंशी(बेडके)*

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)

नविन शैक्षणिक धोरण आवश्यकच परंतु केंद्राने धोरण राबवण्याची घाई करू नये दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे. परंतु आता दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचं महत्त्व कमी होणार आहे. मोदी सरकारने बुधवारी (29 जुलै) नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली. तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन शैक्षणिक धोरण आवश्यक होतेच, मात्र ते राबविण्यास सुरुवात करण्यापूर्वी सरकारने विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यामध्ये त्यासंबंधी वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे. असे मत श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव, महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालय कृती समितीचे सचिव सचिन सूर्यवंशी – बेडके फलटण. यांनी व्यक्त केले आहे.नोटबंदी, जीएसटी, आर्टिकल ३७०, लॉकडाऊन, नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे घाईघाईने घेतलेले व त्याचे दूरगामी दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. याची नोंद संपूर्ण देशात राहील. कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात देशभरात सर्वच प्रकारच्या शैक्षणिक संस्था बंद असताना नवीन शैक्षणिक धोरण राबविण्याची घाई केंद्र सरकारने करु नये असेही सचिन सूर्यवंशी – बेडके यांनी स्पष्ट केले.

Previous articleशेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करावे ; विधानसभा अध्यक्ष नाना पटोले –
Next articleकोरोनासंदर्भातील समस्या व अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरु –
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here