Home Breaking News || *आषाढी वारीचे महत्व* || 🚩🚩🚩 *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा*...

|| *आषाढी वारीचे महत्व* || 🚩🚩🚩 *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज* 🚩🚩🚩

98
0

|| *आषाढी वारीचे महत्व* ||

🚩🚩🚩 *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज* 🚩🚩🚩

मनुष्याचे एक वर्ष हे देवांची अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा देवांचा दिवस असतो.
आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रातीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला ‘देवशयनी’ (देवांच्या निद्रेची, विश्रांतीची) एकादशी,’ असे म्हणतात.
देवांच्या या निद्रकालात, (विश्रांतीच्या काळात) असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरी शक्तींपासून स्वतःचे सौंरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते.
असाच एक मृदुमान्य नावाचा राक्षस होता या राक्षसाने भगवान शंकराची मनोभावे तपस्या करून घेऊन श्री भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले त्यामुळे त्यांनी त्या मृदुमान्य राक्षला श्री भगवान शंकरांनी वर दिला की; तू कोणाकडूनही मरणार नाहीस, पण एका स्त्रीच्या हातून तुला मरण येईल, असा वर दिल्यामुळे आनंदित होऊन त्या उन्मत झालेल्या राक्षसाने देवांवर स्वारी केली. त्यावेळी सर्व देव मदतीसाठी भगवान शंकराकडे गेले मात्र श्री भगवान शंकरांनी त्या मृदुमान्य राक्षसाला वर दिल्यामुळे भगवान शंकरांना काहीच करता येत नव्हते. त्यावेळी देव श्री भगवान शंकरांसह एका गुहेत जाऊन बसले. यावेळी देवांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची या संकटातून मुक्तता केली. त्यादिवशी मुसळधार पाऊस पडू लागला आणि देवांना अन्न मिळाले नाही, व उपवासी राहावं लागलं व सर्वजण गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला.
त्या दिवापासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याचा प्रघात घडला. या देवीचे नाव एकादशी आहे.
*उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे*
शास्त्रानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूंसह देवी एकादशीची मनोभावे पूजा करतो व त्यादिवशी घरात प्रसन्नता ठेवतो व सकाळी उठून शुचिर्भूत होऊन सोवळ्यात पूजा करून ग्रंथ वाचन, किंवा अभंग, हरिपाठ म्हणतो व रात्री फराळाचे पदार्थ किंवा वरव्याचे तांदुळाच्या भात व सोबत शेंगदाण्याची सफेद आमटी हे खाऊन व दुसऱ्या दिवशी बारस सोडतो, याप्रमाणे जी व्यक्ती उपासना करते ती व्यक्ती पाप मुक्त होते असे म्हटले जाते. तसेच त्या व्यक्तीची उत्तरोत्तर प्रगती होत

Previous articleकोरोना पहिली लस ‘कोवाक्सिन’ ! भारतातील मानवावर परीक्षण करण्यास मिळाली परवानगी 🛑 ✍️नवी दिल्ली ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
Next article**सरकार ची मोठी घोषणा -रेल्वे होणार आता खाजगी**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here