Home Breaking News मुंबईतच करोनाचा सर्वाधिक धोका; आतापर्यंत इतके रुग्ण दगावले

मुंबईतच करोनाचा सर्वाधिक धोका; आतापर्यंत इतके रुग्ण दगावले

127
0

🛑 मुंबईतच करोनाचा सर्वाधिक धोका; आतापर्यंत इतके रुग्ण दगावले 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 16 जून : ⭕ महाराष्ट्रामध्ये करोनामुळे जीव गमावलेल्या रुग्णांचे प्रमाण ३९५० इतके असून, दगावलेल्यांची सर्वाधिक संख्या मुंबईतच आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये हे दिसून आले आहे. मुंबईमध्ये सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत २१८२ मृत्यूंची नोंद झाली आहे. इतर सर्व जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये मुंबईतील रुग्णसंख्याही सर्वाधिक असून, ती ५८,२२६ इतकी आहे.

महाराष्ट्रात मृत्यू दर ३.६६ टक्के आहे. रुग्णांची संख्या १,०७,९५८ नोंदवण्यात आली आहे. भारतातील रुग्णसंख्या ३,३२,४२४ आहे. तर देशाचा मृत्यू दर २.८६ टक्के आहे. शून्य ते दहा वर्षे वयोगटामधील ३५३५ मुलांमध्ये करोनाची लक्षणे दिसून येत आहेत. ११ ते २० वयोगटातील ६७११ मुलांना करोना झाला आहे. यापूर्वी या वयोगटातील मुलांमध्ये करोना संसर्गाचे प्रमाण अधिक नव्हते. ते आता वाढलेले दिसते. २१ ते ३० वयोगटामधील रुग्णांची संख्या १९,७२१ आहे. तर ३१ ते ४० या वयोगटात ही संख्या २०,८३४ आहे. ५१ ते ६० वयोगटातील १७,९०६ रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. ११ ते २० वयोगटातील लागण झालेल्या लहान मुलांमधील प्रमाण ६.४३ टक्के आहे. तर २१ ते ३० वयोगटामध्ये हे प्रमाण १८.९० टक्के नोंदवण्यात आले आहे.

वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या २८१ रुग्‍णांपैकी २०० रुग्‍ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये ११४ पुरुष तर ८६ महिला रुग्णांचा समावेश आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ६० टक्के रुग्णांवर वैद्यकीय उपचार दिले जात असून, या रुग्णांची प्रकृतीही सुधारत आहे. यातील ४ रुग्ण हे १५ ते २० वर्षे वयोगटातील असून, ५१ रुग्‍ण २१ ते ३० वर्षे वयोगटातील, ३५ रुग्‍ण ३१ ते ४० वर्षे तर, २३ रुग्‍ण ४१ ते ५०, ३० रुग्‍ण ५१ ते ६० तर २९ रुग्‍ण ६१ ते ७० वर्षे वयोगटातील आहेत. २० रुग्ण हे ७१ ते ८०, २० रुग्‍ण ७१ ते ८० आणि ८ रुग्‍ण ८१ वर्षे व त्‍यावरील वयोगटातील आहेत.⭕

Previous articleचीनमध्ये पुन्हा आढळू लागले कोरोनाचे रुग्ण
Next article‘हे’ आहेत माठातील पाणी पिण्याचे फायदे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here