Home Breaking News २जून रोजी संपुर्ण महाराष्ट्रातून एकाच दिवशी पंतप्रधान मोदींना देणार रूग्ण हक्क परिषद...

२जून रोजी संपुर्ण महाराष्ट्रातून एकाच दिवशी पंतप्रधान मोदींना देणार रूग्ण हक्क परिषद निवेदन

108
0

*विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे*
#२जून रोजी संपुर्ण महाराष्ट्रातून एकाच दिवशी पंतप्रधान मोदींना देणार रूग्ण हक्क परिषद निवेदन #पंतप्रधानांनी_कोरोनाचे_औषधोपचार_मोफत_करावेत
#या मागणीसाठी तहसीलदार आणि जिल्हाधिकार्या मार्फत निवेदन देणार
#संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष उमेश चव्हाण यांची माहिती

#पुणे- एक लाखाहून अधिक कोरोनाचे रूग्ण देशात वाढले असताना सरकारी रुग्णालये अत्यंत वाईट अवस्थेत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. खाजगी आणि धर्मादाय रुग्णालये बेड शिल्लक नाही, आधी एक लाख रुपये डिपॉझिट भरा, आणि रूग्ण बरा झाल्यास अथवा मृत्यूनंतर लाखोंच्या रकमेचे बिल रुग्णाच्या हातावर ठेवत आहेत. अश्या परिस्थितीत हाताला काम – मजुरी नसताना इतके पैसे गोळा करताना लोकांच्या नाकी नऊ येत आहेत.
कोरोनाची जागतिक महामारी असताना लोकांच्या जीवाची काळजी सरकारनेच घ्यायला हवी. लोकांना जीवनावश्यक वस्तू म्हणून फक्त धान्य दिल्याने प्रश्न सुटत नाहीत. आता खरी गरज आहे ती कोरोनाचे उपचार सर्वच हॉस्पिटलमध्ये मोफत करण्याची आणि यासाठी रूग्ण हक्क परिषद पाच मागण्याचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २ जून २०२० रोजी एकाच दिवशी देणार आहे.
या अनोख्या आंदोलना बाबत बोलताना रूग्ण हक्क परिषदेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, कोरोनाच्या उपचारार्थ ज्यांनी लाखो रुपयांची बिले भरली ती परत मिळाली पाहिजेत. यापुढे कोरोनाचे उपचार सर्वच हॉस्पिटलमध्ये मोफत झालेच पाहिजेत. कोरोनाची तपासणीही मोफत झालीच पाहिजे. लोकांच्या दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला दहा हजार रुपये तातडीने खात्यावर दिले पाहिजेत या प्रमुख मागण्यासाठी मंगळवारी २ जून २०२० रोजी एकाच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊ. मागण्या अमान्य केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
पंतप्रधान यांना संबधित तालुक्याचे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत रूग्ण हक्क परिषदेचे शिष्टमंडळ निवेदन सादर करणार आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव फक्त पाच कार्यकर्ते पदाधिकारी फिजिकल डिस्टन्स ठेवून शिष्टमंडळात सहभागी होतील. मात्र एका तालुक्यातून सुमारे आठ ते दहा शिष्टमंडळे तहसीलदार यांच्या मार्फत पंतप्रधानांना निवेदन देतील तर शहर व जिल्ह्याची कमिटी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अनेक शिष्टमंडळे तयार करून मोफत उपचाराची मागणी करतील.

Previous articleसमाजसेवक शेखर शेरे यांनी विभागात केले असैनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप
Next articleकर्तव्यावर एसटी चालकाचा मृत्यू मालेगावजवळील घटना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here