⭕ठाकरे सरकारला नारळ द्या!
राष्ट्रपती राजवट लागू करा, राणेंची राज्यपालांकडे मागणी⭕
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई :- ‘ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी’, अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांकडे केली. हे सरकार लोकांचा जीव वाचवण्यास, उदरनिर्वाह करण्यास सक्षम नाही, असा हल्लाबोल राणेंनी केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यात सक्षम नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, सरकारी रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. कोरोनामुळे राज्यावर गहिरं संकट आहे.
हे सरकार लोकांचे जीव वाचवू शकत नाही. कोरोना संकट हातळण्यात सरकार अपयशी ठरत आहे. या परिस्थितीचा विचार करून राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू करावी. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसल्याने त्यांना परिस्थिती हाताळता येत नसल्याची टीका देखील नारायण राणे यांनी केली. नारायण राणे यांनी पुढे म्हटले की, आतापर्यंत राज्याला जे काही दिलंय ते केंद्र सरकारने दिलं आहे. एका तोंडानं राज्य सरकार केंद्राचं कौतुक करतं. दुसऱ्या तोंडानं टीका करतं. हे कोणत्या प्रकराचं राजकारण हे समजण्यापलिकडे आहे.
या सरकारचा अभ्यास नाही, सरकारी अधिकाऱ्यांना कसं हाताळावं, त्यांचे प्राण कसे वाचवावेत, पोलिसांना कसे सुरक्षित ठेवावं याचा अभ्यास नाही, अशा शब्दात नारायण राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील विशेषत: मुंबईतील रुग्णालयं लष्कराच्या ताब्यात दिली तरच परिस्थिती सुधारेल, असं नारायण राणे म्हणाले…