Home आंतरराष्ट्रीय भारत आमची जागा कधीच घेऊ शकत नाही ! कंपन्या बाहेर पडल्यामुळे चीन...

भारत आमची जागा कधीच घेऊ शकत नाही ! कंपन्या बाहेर पडल्यामुळे चीन मोदींवर भडकला

112
0

⭕भारत आमची जागा कधीच घेऊ शकत नाही !
कंपन्या बाहेर पडल्यामुळे चीन मोदींवर भडकला ⭕

( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

दिवसेंदिवस रसातळाला जाणारी अर्थव्यवस्था पाहता भारतही औद्योगिक प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
बीजिंगः जगातील बहुतेक देशांची अर्थव्यवस्था कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे कोलमडली आहे. दिवसेंदिवस रसातळाला जाणारी अर्थव्यवस्था पाहता भारतही औद्योगिक प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. उद्योगविश्वात चीनला मागे टाकत ते स्थान मिळवण्याचा भारताचा मानस आहे. त्यावरूनच चीननं आता भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून भारताच्या अशा प्रयत्नांवर चीननं टीका केली आहे. चीनमधील अनेक कंपन्या आता भारतात मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स सुरू करण्याच्या विचारात आहेत, ज्याने भारताच्या शेजारचा देश असलेला चीन बिथरला आहे. चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने भारताच्या अशा प्रयत्नांवर चिंता व्यक्त केली आहे. भारत कधीही चीनला पर्याय बनू शकत नाही, असाही त्यात उल्लेख केला आहे. अलीकडेच एका जर्मन शू कंपनीने आपले उत्पादन युनिट चीनमधून भारतातल्या उत्तर प्रदेशमध्ये हलविण्यात येणार असल्याचे सांगितले. तेव्हापासून चीनची चिंता वाढली आहे. त्याचप्रमाणे इतरही अनेक कंपन्या भारतात येण्यास उत्सुक आहेत. याशिवाय अनेक कंपन्या चीनबाहेर जाण्याचा विचार करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशने चीनमधील अशा मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी आर्थिक टास्क फोर्सची स्थापना केली आहे
भारत कधीही यशस्वी होणार नाहीः ग्लोबल टाईम्स
एवढे प्रयत्न करूनही कोरोना साथीच्या काळात आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर चीनला मागे ठेवून भारत जगातील उद्योगविश्वाचा कारखाना होण्याची शक्यता नाही. भारत चीनला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे, पण ही फक्त देशाप्रति असलेली काही लोकांची विचारसरणी आहे. तो राष्ट्राभिमान आहे, बाकी काही नाही. अशा अभिमानाने आर्थिक बाबींच्या पलीकडे जाऊन आपण सैन्य स्तरापर्यंत पोहोचलो आहोत. ज्यामुळे काही लोकांना वाटतं की आता ते चीनच्या सीमेवरील प्रश्न चुटकीसरशी सोडवतील. चीनचा सामना करू शकतील. असे विचार भारतासाठी निःसंशयपणे धोकादायक आणि दिशाभूल करणारे आहेत.
आतापर्यंत चीनच्या सीमा संरक्षण दलांनी सीमा नियंत्रण उपायांना चालना दिली आहे. गॅल्वान व्हॅली भागातील सीमा नियंत्रण परिस्थितीत एकतर्फी बदल करण्याच्या भारताच्या नुकत्याच केलेल्या प्रयत्नाला उत्तर देताना आवश्यक ती पावले उचलली गेली आहेत, असंही या चिनी वृत्तपत्रात लिहिलेलं आहे. चिनी वृत्तपत्र लिहितो की, पाश्चिमात्य माध्यमांनीही यावेळी चीनच्या बाजाराच्या संभाव्यतेची तुलना करून भारताची स्पर्धात्मकता वाढविण्याचा उत्साह दाखविला आहे, ज्यामुळे काही भारतीय वास्तविक परिस्थितीपासून संभ्रमित झाले आहेत. सध्या भारत चीनची जागा घेईल, असा विचारदेखील अकल्पनीय आहे.
चीन आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे भारताला औद्योगिक स्तरावर आकर्षित करण्याची संधी मिळेल असे वाटते, पण दक्षिण आशियाई देशांमध्ये त्यांच्या निकृष्ट पायाभूत सुविधांची कमतरता, कुशल कामगार नसणे आणि परकीय गुंतवणुकीच्या कठोर बंधनामुळे अशी संधी मिळणं अवघडच आहे.  भारत पुढील जागतिक कारखाना होण्याचे स्वप्न पाहत आहे आणि मोदी सरकारनेही ‘मेक इन इंडिया’ मोहिमेसारख्या उद्दिष्टांसाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत, ज्याचा जगावर फारसा परिणाम होऊ शकला नाही. भौगोलिक राजनैतिक पद्धतींमध्ये ड्रॅगन आणि आशियातील हत्ती यांच्यातील लढाई वेगाने विकसित होत आहे, परंतु दोन प्रमुख उदयोन्मुख बाजारपेठा एकत्र येण्याचा मार्ग शोधू शकतील आणि या प्रक्रियेदरम्यान, व्यावहारिकतेसह भारतीय अर्थव्यवस्थेने त्याबद्दल गंभीरपणे विचार करणे आवश्यक असल्याचाही सल्ला ग्लोबल टाइम्सनं दिला आहे.

Previous articleदहिवडला गोरगरीबांना नागरिकांच्या आर्थिक मदतीमुळे किराणा वाटप दहिवड
Next articleअमरावती आणि अकोला येथे कोरोनाचा उद्रेक !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here