Home महाराष्ट्र बँका गुरुवारपासून पाच तास सुरु राहणार

बँका गुरुवारपासून पाच तास सुरु राहणार

166
  • ⭕ बँका गुरुवारपासून पाच तास सुरु राहणार ⭕
  • ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

    औरंगाबाद : शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत, जिल्हा प्रशासनाने गेल्या सहा दिवसापासून शहरातील सर्व बँक बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता गुरूवार(ता.२१) बँका सुरू होणार आहे. सकाळी आठ ते दुपारी एक यावेळत बँका सुरू राहतील, अशी माहिती अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी बुधवारी(ता.२०) दिली.

    कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन सर्व तर आजचे प्रयत्न करत आहे. मात्र नागरिक लॉक डाऊन मोडत आहे. यामुळे १५ ते १७ आणि १८ ते २० मे दरम्यान रात्री बारा वाजेपर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आला. शहरातील सर्व बँका बुधवारपर्यंत बंद होत्या.
    सर्व ऑनलाईन बँकिंगच्या सुविधा या सुरू राहणार आहेत. या सुविधा सुरळीत राहावी यासाठी सर्व बँकांचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यरत होते.असेही श्रीकांत कारेगावकर यांनी सांगितले.

    कँटोन्मेंट झोनमधील बँकांच्या शाखा बंद

    कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. यानुसार कोरोना प्रभाव असलेल्या भागातील बँकाच्या शाखा ३१ मेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत. या भागातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या १५ हुन अधिक शाखा बंद ठेवण्यात आल्या आहेत. बंद असलेल्या शाखांमधील कर्मचारी हे इतर शाखांमध्ये पाठवण्यात आले आहे.

Previous articleरेल्वे पाठोपाठ विमानवाहतूक सुरू होणार! २५ मे तारीख ठरवली.
Next articleसंपूर्ण गाव झाले कोरोना मुक्त! यंत्रणेने सोडला सुटकेचा निःश्वास!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.