Home Breaking News रेल्वे मंत्र्यांकडून मोठी घोषणा! १ जून पासून दररोज २०० विशेष गाड्या...

रेल्वे मंत्र्यांकडून मोठी घोषणा! १ जून पासून दररोज २०० विशेष गाड्या धावणार

98
0
  • ⭕ रेल्वे मंत्र्यांकडून मोठी घोषणा!
    १ जून पासून दररोज २०० विशेष गाड्या धावणार ⭕
    ( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

    नवी दिल्ली : देशभरात अडकलेल्या गरीब मजुरांना दिलासा देण्यासाठी रेल्वेनं मोठी घोषणा केली आहे. मजुरांना सोडण्यासाठी सध्या श्रमिक विशेष रेल्वे सुरू आहेत. यानंतर आता रेल्वे देशभरात मेल एक्स्प्रेस ट्रेन्स सुरू करण्याच्या तयारीत आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. १ जूनपासून दररोज २०० स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार असल्याचं गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या गाड्यांसाठी ऑनलाईन बुकिंग करता येईल.

    १ जूनपासून देशभरात २०० विशेष मेल एक्स्प्रेस चालवल्या जाणार असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी ट्विट करून दिली.

    या गाड्या वेळापत्रकानुसार धावतील. या गाड्यांमध्ये वेटिंग लिस्टचा पर्याय असेल. मात्र तत्काळ किंवा प्रीमियम तत्काळसारखे पर्याय उपलब्ध नसतील. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन ट्रेनच्या तिकिटांचं बुकिंग करता येईल. ट्रेन बुकिंग केव्हापासून सुरुवात होईल, याची माहिती लवकरच दिली जाईल.

Previous articleजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आक्रमक
Next articleम्हाळुंगे- येथील श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुलात १ हजार बेडस् तयार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here