Home उतर महाराष्ट्र शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्याजवळ कंटेनरच्या धडकेत मामा-भाचा जागीच ठार..

शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्याजवळ कंटेनरच्या धडकेत मामा-भाचा जागीच ठार..

58

आशाताई बच्छाव

1002387256.jpg

शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्याजवळ कंटेनरच्या धडकेत मामा-भाचा जागीच ठार..

(विरदेल प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्याजवळ कंटेनरच्या धडकेत मामा-भाचा जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच शिंदखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.शिंदखेडा तालुक्यातील पिंप्राळ गावातील रहिवासी सुनिल साहेबराव बेहेरे(विरदेलकर)(३५) व त्यांचा भाचा चेतन पंकज देसले (२१) रा. भडणे हे आज याच्यासोबत दुचाकी (एमएच १८/ बीडब्ल्यु २४२०) ने एमआयडीसीत नेहमीप्रमाणे कामाला जात होते. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बाभळे फाट्याजवळ मागाहून येणाऱ्या भरधाव कंटेनर (डिएन ०९/आर ९८६७) ने त्यांच्या दुचाकीला जोदार धडक दिली. या भीषण अपघातात मामा-भाचे जागीच ठार झाले. यावेळी रस्त्यावरील प्रवाशांनी तात्काळ पोलीस मदत केंद्रावर माहिती कळविली. त्यानंतर शिंदखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दोघांना १०८ रुग्णवाहिकेद्वारे नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र दोघांची प्राणज्योत मालवली होती.
दरम्यान, या अपघातानंतर कंटेनर चालक चंद्रभान सीतलाप्रसाद प्रजापती (३२) रा. उत्तरप्रदेश ह.मु. रा. चेंबुर, मुंबई हा स्वतः हून शिंदखेडा पोलीस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी पंकज जगन्नाथ देसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कंटेनर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleश्रद्धेच्या ठिकाणी दुर्गंधीचा विळखा! सेमाना देवस्थानात अस्वच्छतेचा कळस,ट्रस्ट व प्रशासन मौनात ?
Next articleजागेच्या वादातून उपसरपंच व लहान भावाला तिघांची मारहाण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.