Home उतर महाराष्ट्र अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्ताचे सरसकट पंचनामे करून,, तात्काळ मदत द्या,- भाजपा उपाध्यक्ष -विशाल...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्ताचे सरसकट पंचनामे करून,, तात्काळ मदत द्या,- भाजपा उपाध्यक्ष -विशाल धनगर

83

आशाताई बच्छाव

1001985318.jpg

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्ताचे सरसकट पंचनामे करून,, तात्काळ मदत द्या,- भाजपा उपाध्यक्ष -विशाल धनगर
सोनई प्रतिनिधी कारभारी गव्हाणे:नेवासा तालुक्यामध्ये आठ दिवसापासून अतिवृष्टी व सततचा पाऊस झाल्याने तालुक्यातील खरीप पिक,कापूस ,सोयाबीन ,तूर ,मूग ,उडीद ,मका,बाजरी सह फळबागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शासनाने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे मागणी भाजपाचे नेवासा तालुका उपाध्यक्ष विशाल धनगर यांनी नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदन द्वारे केली आहे.या हंगामामध्ये पडलेल पावसाचा खंड व त्यानंतर असलेली अतिवृष्टी आणि रोगाच्या साथी किडीचा प्रादुर्भाव यामुळे हजारो एकर क्षेत्र आधीच बाधित झाले असताना परतीच्या पावसाने उरल्या सुरल्या पिकाचेही नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे.
पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक जमिनीतील पीक व जमिनी खरडून गेलेले आहेत,, बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने पाण्याचा निचरा न झाल्याने लोकांच्या घरात पाणी घुसले किंबहुना काही ठिकाणी घरावर झाडे पडून घरे उध्वस्त झाले आहे, काही घरे ,गुराचे गोठे , कोसळले असून नुकसानग्रस्ताच्या घरातील जीवनावश्यक वस्तूसह सर्व सामान भिजल्याने (अन्नधान्य कपडे व इतर) समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे.. काही बाजारपेठामध्ये पुराचे पाणी गेल्याने व्यापाऱ्यांचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
तरी तालुक्यातील सर्वच मंडलामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून आपण मंडलाध्यक्षांना व तलाठी अधिकारी यांना सूचना करून प्रशासनाने सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत देण्याची मागणी नेवासा तालुक्याचे भाजप पक्षाचे उपाध्यक्ष विशाल धनगर यांनी नेवासा येथील नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Previous articleनवरात्रौत्सव काळात देवीची उपासना विशेष फलदायी
Next articleमनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा २७ रोजी नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.