Home नाशिक शेवटच्या घटकापर्यंत शासकीय सेवा पोहोचवण्यासाठी १७ सप्टेंबर पासून सेवा पंधरवडा

शेवटच्या घटकापर्यंत शासकीय सेवा पोहोचवण्यासाठी १७ सप्टेंबर पासून सेवा पंधरवडा

85
0

आशाताई बच्छाव

1001943903.jpg

शेवटच्या घटकापर्यंत शासकीय सेवा पोहोचवण्यासाठी १७ सप्टेंबर पासून सेवा पंधरवडा

जास्तीत जास्त नागरिकांनी मोहिमेत सहभाग नोंदवावा तहसीलदार विशाल नाईकवाडे साहेब यांचे आवाहन

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी

प्रशासनाने सामान्य नागरिकांच्या दारापर्यंत सरकारी सेवा पोहोचवण्याच्या ध्येयाने ‘सेवा पंधरवडा’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. महसूल विभागाच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या या अभियानांतर्गत, छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत, शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जाणार आहे .या पंधरवड्यात ‘पांदण रस्ते’, ‘सर्वांसाठी घरे’ आणि विविध ‘नाविन्यपूर्ण उपक्रम’ राबवले जाणार आहेत. तरी या सेवा पंधरवड्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे साहेब यांनी केले आहे.

प्रशासनाचा सूक्ष्म नियोजनावर भर
या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. सर्व शासकीय कामे वेळेत आणि गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना या योजनांचा लाभ घेता येईल. या अभियानांतर्गत, माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली तीन टप्प्यांमध्ये विविध उपक्रम राबवले जातील.

पहिला टप्पा: पांदण रस्ते मोहीम (17 ते 22 सप्टेंबर 2025)
या टप्प्यात शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पांदण रस्ते आणि शिव रस्त्यांच्या कामावर विशेष भर दिला जाईल. यामध्ये पांदण रस्त्यांना क्रमांक देणे, त्यांचे संरक्षण करणे आणि गाव नकाशावर त्यांची नोंद घेणे यांसारखी कामे केली जातील. तसेच, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्रे घेतली जातील. प्रलंबित प्रकरणांवर तोडगा काढण्यासाठी विशेष ‘रस्ता घालत’ शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचे कष्ट कमी होतील अशी अपेक्षा आहे.

दुसरा टप्पा: सर्वांसाठी घरे आणि पट्टेवाटप मोहीम (23 ते 27 सप्टेंबर 2025)
हा टप्पा ‘सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी योजनेवर केंद्रित आहे. या योजनेअंतर्गत, घर बांधण्यासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनींचे पट्टे पात्र लाभार्थ्यांना वाटप केले जातील. त्याचबरोबर, शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमानुसार नियमित केली जातील. यामुळे अनेक गरजू कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे घर मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल.

तिसरा टप्पा: नावीन्यपूर्ण उपक्रम (28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025)
या टप्प्यात प्रशासन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार आहे. यात ‘आपली लक्ष्मी’ मुक्त योजना, आपसी हिस्सेवाटणीची प्रकरणे निकाली काढणे आणि शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे (सर्टिफिकेट) वाटप करणे यांसारख्या कामांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना थेट प्रशासकीय सेवेचा अनुभव घेता येणार आहे.या अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाईल. तसेच, स्थानिक लोकप्रतिनिधींना ही यात सहभागी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून प्रशासकीय कामे अधिक प्रभावीपणे पार पडतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here