Home विदर्भ 25 देशी झाडं लागवड व संगोपन कार्याचा शुभारंभ

25 देशी झाडं लागवड व संगोपन कार्याचा शुभारंभ

38
0

आशाताई बच्छाव

1001933834.jpg

25 देशी झाडं लागवड व संगोपन कार्याचा शुभारंभ
हिंगोली .श्रीहरी अंभोरे पाटील
हिंगोली येथील वैजनाथ अप्पा सराफ नागरी सहकारी बँक आणि सदभाव सेवाभावी संस्थेचा वतीने उपक्रम राबविण्यात आला आहे
हिंगोली येथील श्री संत नामदेव कवायत मैदान, तिरुपती नगर आणि महावीर नगरात या ठिकाणी देशी झाडे एकुण 7 ते 8 फुटाची उंची असले ऐकुन 25 देशी झाडं लावण्यात आले आहे आणि त्या ठिकाणी लागवड करण्यात आलेल्या झाडांना जगविण्यात येणारं आहे. याचा शुभारंभ वैजनाथ अप्पा मराठवाडा नागरी सहकारी बँक लिमिटेड हिंगोलीचे माजी चेअरमन तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुरेशअप्पा सराफ यांच्या हस्ते पिंपळाचे आणि बदामचे झाडं लागवड करून करण्यात आला आहे
सदभाव सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने वड, पिंपळ, बदाम, बहावा, कडुलिंब, कदंब, बकुळ आदि विविध देशी जैवविविधता राखणारी झाडं लावण्यात येणार आहेत. निसर्गाचे पर्यावरण संतुलित राखण्यासाठी व मानवी जीवनाला पशुपक्ष्यांना विसावा व सर्व प्राण्यांना ऑक्सिजन मिळावा यासाठी हे पाऊल उचलनं आवश्यक असल्याने हा कार्यक्रम घेण्यात बोलण्यात आले होते त्यानुसार त्या वटवृक्षांची लागवड ही करण्यात आली.
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष शर्मा,रेणुकादास वैद्य,रवींद्र येवले, विलास गोटरे, प्रदीप जोशी,किरण जोशी, गजानन नपते, नरेश पालीमकर, योगेश शर्मा,अजय शर्मा,अमरजीत महाजन,शरद जाधव तसेच
सदभावचे डॉ. अभयकुमार भरतीया, विनोद खरात, पी एस आय शैलेश मुदिराज, साईनाथ अनमोड, जमादार संजय मारके,ऍड. सुभाष वाघमारे, मुजाहीद पठाण, सतीश लदनिया, अर्जुन यादव यांची उपस्थिती होते

Previous articleविद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय कोळसा येथे स्वयंशासन दिन साजरा
Next articleवसमत मंगळवार बाजारातील व्यापारी व बाजारहाट पावसाने केली मोठी नुकसान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here