Home नांदेड अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या.. दिनेश आवडके

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या.. दिनेश आवडके

125
0

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0026.jpg

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या..
दिनेश आवडके

मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
गेल्या दिड-दोन महिन्यांमध्ये झालेल्या सततधार पावसामुळे शेतातील पिके पिवळी पडली होती.मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा अतिवृष्टीचा सादर केलेला अहवाल रद्द करून नव्याने शेतकऱ्यांना न्याय देणारा पुन्हा अतिवृष्टी अहवाल सादर करावा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली होती.त्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली होती.सुरूवातीला चांगला पाऊस झाल्याने पिकांची उगवन चांगली झाली होती. माञ मध्यंतरी अनेक दिवस संततधार पाऊस झाल्याने शेतातील पिके पिवळी पडली. त्यातच गोगलगायीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामा धोक्यात आला आहे. मुखेड महसूल विभागाने सादर केलेला ६४५ हेक्टर जमीन अतिवृष्टीमुळे सादर केलेला अहवाल अतिशय चूकिचे असून हा अहवाल रद्द करून नव्याने अहवाल सादर करावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन व अधिकाऱ्यांना धारेवर धरू असे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केली जात आहे. अधिकारी पंचनामे करतील शासनाकडून मदत मिळेल अशी आशा शेतकरी लावून धरला आहे. संततधार पावसामुळे मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे ७० टक्के पेक्षाही जास्त नुकसान झाले असून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडली आहे.नव्याने न्याय देणारा अतिवृष्टीचा अहवाल सादर करावा अन्यथा शेतकरीसह रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा काॅग्रेसचे युवा नेते दिनेश शिवराजप्पा आवडके यांनी केला आहे.

Previous articleग्रामपंचायत कार्यालय तांदळी हर घर तिरंगा जनजागृती मोहिम
Next articleपाऊस आकाशीचा आणि देशभक्तीचा 100 फूटी ध्वजस्तंभावर शानदार ध्वजारोहण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here