Home Breaking News *विना मास्क फिरणाऱ्यांवर 57 हजारावर दंड वसुल*

*विना मास्क फिरणाऱ्यांवर 57 हजारावर दंड वसुल*

274

*विना मास्क फिरणाऱ्यांवर 57 हजारावर दंड वसुल*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

कोल्हापूर शहरात विना मास्क फिरणाऱ्या 247 नागरिकांकडून महानगरपालिकेच्या पथकांनी आज 57 हजार 300 रुपयांच्या दंडाची कारवाई केली, असल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.
नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करुन महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका प्रशासन युध्दपातळीवर उपाययोजना राबवित आहे, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे
पालन करुन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे. यापुढील काळातही विना मास्क फिरणाऱ्यांवर तसेच हँड ग्लोव्हज शिवाय भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
महानगरपालिका प्रशासनाने विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी विशेष पथके तैनात केली असून आज दिवसभरात या पथकांनी शहरात विना मास्क फिरणाऱ्या 247 नागरिकांकडून 57 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये केएमटी कर्मचाऱ्यांकडून 147 नागरिकांकडून 17 हजार 800 रुपयांचा तर इस्टेट विभागाकडून 20 जणांकडून 25 हजार 500 रुपयांचा, विभागीय कार्यालय क्रं. 4 कडून 70 जणांकडून 12 हजार रुपयांचा तर विभागीय कार्यालय क्रं.3 कडून 10 जणांकडून 2 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. याबरोबरच सायंकाळी 7 नंतर दुकाने सुरु ठेवल्याबद्दल 8 दुकानदाराकडून 2 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आल्याची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली.

Previous articleपुरोगामी पत्रकार संघाची बागलाण तालुका कार्यकारणी जाहीर
Next article🛑 रेशनकार्ड मधून तुमचं ,पत्नीचं किंवा मुलाचं नाव वगळलं गेलं असेल तर…! हि सोपी पद्धत अवलंबा 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.