Home गुन्हेगारी विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या नावाने २५ लाखांच्या खंडणीची मागणी. आरोपींशी झालेल्या झटापटीत गुटखा...

विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या नावाने २५ लाखांच्या खंडणीची मागणी. आरोपींशी झालेल्या झटापटीत गुटखा व्यापाऱ्याचा मृत्यू गुटख्याचे भरलेली पीक अप पळवली.

281

आशाताई बच्छाव

1002818003.jpg

विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या नावाने २५ लाखांच्या खंडणीची मागणी. आरोपींशी झालेल्या झटापटीत गुटखा व्यापाऱ्याचा मृत्यू गुटख्याचे भरलेली पीक अप पळवली.

देवळा प्रतिनिधी : – ( भिला आहेर) विशेष पोलीस महानिरीक्षक पथकाचे अधिकारी असल्याची बतावणी करून आलेल्या तीन जणांनी गुटखा भरलेली पीक अप वाहन अडवून चालक व त्या सोबत असलेला व्यापारी जब्बार चांदभाई तांबोळी (५५) यांचे अपहरण करून २५ लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. यात झालेल्या झटापटीत जब्बार याचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत देवळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार दि. ११ रोजी मयत जब्बार चांदभाई तांबोळी (५५) रा. पिंपळगाव ( वा. ) हा चांदवड येथील इलियास बागवान यांचे पीकअप वाहन क्र एम एच १५ एच एच ८८६१ घेऊन गुजरात येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर संबंधित वाहनात माल भरून पुन्हा देवळा येथे येत असताना कळवण तालुक्यातील एकलहरे येथून काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने त्यांचा पाठलाग केला .रात्री 12 वाजेच्या सुमारास भऊर फाट्याजवळ पीकअप वाहनास स्कॉर्पिओ गाडी आडवी लावून चालक इलियास बागवान व जब्बार तांबोळी यांना बळजबरीने खाली उतरून स्कॉर्पिओ गाडीत बसविले .आम्ही आयजी स्कॉड चे माणसे असून, तूम्ही गुटख्याची वाहतूक करतात जर तुम्हाला केस करायची नसेल तर आम्हाला २५ लाख रुपये द्या अशी खंडणीची मागणी केली . तसेच त्यापैकी एकाने पीक अप वाहन घेऊन पोबारा केला. यात जब्बार तांबोळी यांनी ११ लाख रुपये देण्याचे कबुल केले. जब्बार यांचा मुलगा साहिल तांबोळी यास पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्या कालावधीत खामखेडा सटाणा रोडवरील प्रथमेश वाइन जवळ जब्बार तांबोळी यांना अस्वस्थ वाटू लागले. मात्र संशयित आरोपीनी त्यांना दमबाजी करत मारहाण केली .त्यामुळे जब्बार तांबोळी बेशुद्ध होऊन पडले. हे पाहून संशयित त्यांची गाडी सोडून फरार झाले .त्यांचा मुलगा साहिल तसेच पिंपळगावचे उपसरपंच नदिश थोरात ,महेंद्र पाटील व अमोल पाटील हे चौघे पैसे घेऊन प्रथमेश वाइन जवळ गेले असता जब्बार यास जमिनीवर पडलेलले पाहून सटाणा येथे उपचारासाठी घेऊन गेले .डॉक्टरानी त्यांना तपासून मयत घोषित केले .त्यानंतर फिर्यादी इलिसाय सुलतान बागवान वय ४४ रा चांदवड यांच्या फिर्यादी वरून संशयित आरोपी विलास जगताप ,मुहम्मद शफीक मुहंमद रफिक रा. मालेगाव, महेश भामरे रा. तांदूळवाडी, ता. सटाणा या तिघांवर जब्बार याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. जब्बार यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगी ,दोन मुले असा परिवार आहे .जब्बार यांच्या एका मुलीचे येत्या 7 मे रोजी लग्न होते .त्यांच्या निधनाने देवळा शहरासह पिंपळगाव ( वा. ) परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . या घटने बाबत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील ,अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली . अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील ,पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे,सुभाष चव्हाण, नितीन बारहाते, राहुल शिरसाठ तपास करीत आहेत .

चौकट : सदर संशयित हे गोरक्षक असल्याची माहिती मिळत असून,गोरक्षणच्या नावाखाली रात्री अपरात्री वाहनाचा पाठलाग करून वाहने अडवून चालकांना दमबाजी करून त्यांच्या कडून खंडणी उकळत असतात . तसेच गोरक्षणाच्या नावाखाली गोरख धंदे करत असल्याची चर्चा आहे .
फोटो : मयत जब्बार तांबोळी

Previous articleकौळाणे (नि.) : राजवाड्याच्या प्रवेशद्वारावरील अतिक्रमण प्रकरण तापले; आंदोलनानंतर ग्रामपंचायतीची हालचाल, संबंधित व्यक्तीस नोटीस
Next articleEpaper yuva maratha 15 March 2026
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.