आशाताई बच्छाव
राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी मोठी गर्दी केल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह उफाळून आला.
महापालिकेत आमच्या शिवाय महापौर होणार नाही ~अरविंद चव्हाण
जालना: दिलीप बोंडे ब्युरो चीफ/
महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) दोन अंकीचा आकडा पार केल्याशिवाय राहणार नाही, आणि आमच्या शिवाय कोणत्याही पक्षाला महापौर करता येणार नाही असा दावा जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आ.अरविंदराव चव्हाण यांनी केला. रविवार रोजी
इच्छुकांनी मोठी गर्दी केल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह उफाळून आला.
जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवार रोजी जिल्हा पक्ष कार्यालय येथे जालना महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी आणि इच्छूक उमेदवारांना पक्षाचे उमेदवारी अर्ज वितरण करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी श्री चव्हाण बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे शिव,शाहू, फुले आंबेडकर यांच्या समतेच्या विचाराशी प्रेरित होऊन पक्ष संघटना उभी करत आहे. त्यांच्या या धर्मनिरपेक्ष विचारामुळे समाजातील सर्व समाज घटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे.
आगामी महापालिकेच्या निवडणुकीत पक्षातील सर्व समाज घटकातील कार्यकर्त्यांना पक्षाची उमेदवारी देऊन न्याय देण्याचे आश्वासन श्री. चव्हाण यांनी यावेळी दिले. जालना शहराचा सर्वांगीण विकास होऊन शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी आमचा पक्ष कटिबद्ध राहील असे श्री चव्हाण यांनी सांगितले.
पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्ते अग्रेसर ~ शेख मेहमूद
जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस






