Home गडचिरोली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मौशिखांब येथे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे...

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मौशिखांब येथे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांचा बूथ प्रमुखांसोबत संवाद

37

आशाताई बच्छाव

1002191404.jpg

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मौशिखांब येथे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांचा बूथ प्रमुखांसोबत संवाद

मौशिखांब,/गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मौशिखांब येथे आज आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या उपस्थितीत बूथ प्रमुखांची महत्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी बूथ संघटन अधिक मजबूत कसे करता येईल, यावर सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले. “प्रत्येक बूथ हा आपल्या विजयाचा पाया आहे, आणि कार्यकर्ताच पक्षाचा खरा आधारस्तंभ आहे,” असे आमदार डॉ. नरोटे यांनी यावेळी सांगितले.

चर्चेदरम्यान गावातील नागरिकांनी मांडलेल्या विविध स्थानिक समस्या, विकासकामांच्या गरजा आणि जनतेच्या अपेक्षा यांचा देखील आढावा घेण्यात आला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याबाबतही चर्चा झाली.

आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांनी कार्यकर्त्यांना संदेश देताना सांगितले की, “निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. एकजुटीने, शिस्तबद्ध पद्धतीने आणि जनतेच्या विश्वासावर आधारित कार्य केल्यास पक्षाचा झेंडा नक्कीच अधिक उंच फडकवता येईल.”

या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीसाठी सर्वांनी नव्या जोमाने तयारीला सुरुवात केली आहे.

Previous articleराष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजसेवी संस्थेकडून रक्तदान शिबिराचे आयोजन
Next articleभाजपाचे हर्षल गेडाम यांचा प्रभाग क्र. २ मध्ये घरोघरी जनसंपर्क — जनतेचा जबरदस्त प्रतिसाद!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.