Home सामाजिक शेतकऱ्याचा भावनिक प्रश्न दहा वर्षांपूर्वी सोयाबीनला जो भाव होता… तोच भाव आजही...

शेतकऱ्याचा भावनिक प्रश्न दहा वर्षांपूर्वी सोयाबीनला जो भाव होता… तोच भाव आजही आहे!

94

आशाताई बच्छाव

1001989477.jpg

शेतकऱ्याचा भावनिक प्रश्न

दहा वर्षांपूर्वी सोयाबीनला जो भाव होता… तोच भाव आजही आहे!
पण या दहा वर्षांत महागाईने आभाळ गाठले, डिझेल-पेट्रोलचे दर आकाशाला भिडले, खतं-दवाखानं-पिकाची मशागत दुप्पट-तिप्पट महागली… मग शेतकऱ्याच्या सोयाबीनला जुना भावच का?

प्रगती नेत्यांच्या भाषणात झाली, शेतकऱ्याच्या शेतात नाही.
सभांमधून दिले जाणारे आश्वासने, प्रगतीच्या गप्पा, शेतकऱ्याच्या जीवनात मात्र फक्त फसवणूक घेऊन आल्या.
आज शेतकरी पेरतो, पिकवतो, राबतो, घाम गाळतो, पण बाजारात गेला की त्याचा घाम कौडीमोलाचा होतो.

दहा वर्षांत प्रत्येक क्षेत्र बदलले, प्रगती केली… पण शेतकऱ्याच्या उत्पादनाला मिळणारा भाव मात्र दहा वर्षांपूर्वी जिथे होता तिथेच आहे.
मग शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आयुष्य, हे कोण पाहणार?
शेतकऱ्याला ‘जगवू’ असं सांगून फक्त मतं मागितली, पण खऱ्या अर्थाने शेतकरी जगला आहे का?

आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच आक्रोश आहे –
“आमच्या शेतमालाला खरी किंमत द्या… अन्यथा आमच्या पिढ्या शेती सोडतील. भाषणातून नाही तर शेतातून प्रगती दिसली पाहिजे.”

👉 शेतकरी हा देशाचा कणा आहे. तो वाकलाय, पण तुटलेला नाही. मात्र न्याय्य दर न मिळाल्यास हा कणा मोडायला वेळ लागणार नाही!

स्वप्निल बाप्पू देशमुख ( पत्रकार)
मो. 9552381088

Previous articleश्रीमद्भगवतगीता ज्ञान स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक व सन्मानपत्र वितरण सोहळा
Next articleओला दुष्काळ जाहीर करा हेक्टरी ५० हजार मदत करा वसमत सरपंच संघटनेचे उपविभागीय अधिकारी माने यांना निवेदन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.