Home उतर महाराष्ट्र शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त

शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त

58

आशाताई बच्छाव

1001983997.jpg

शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त

अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे – श्री  शनैश्देवरवस्थान, शनिशिंगणापूर येथील विश्वस्त मंडळाला भ्रष्टाचाराचे आरोप, गैरव्यवस्थापन, बनावट अॅप घोटाळा, कर्मचारी वर्गातील वाद आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न या पार्श्वभूमीवर अखेर शासनाने बरखास्त केले आहे. महाराष्ट्र शासनाने २२ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या आदेशानुसार, जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांची तात्पुरते प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून समिती गठीत होईपर्यंत तेच देवस्थानचा कारभार पाहणार आहेत. हा आदेश राज्यपालांच्या नावाने जारी करण्यात आला आहे.
शासनाच्या आदेशानुसार, १३ ऑगस्ट २०१८ रोजी श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था (शिंगणापूर) अधिनियम, २०१८ राजपत्रात प्रसिद्ध झाला होता. भाविकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी, पारदर्शक व उत्तरदायित्वपूर्ण प्रशासन घडवण्यासाठी आणि देवस्थानवरील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा अधिनियम लागू करण्यात आला होता. सदर अधिनियमाचा प्रत्यक्ष अंमल मात्र २२ सप्टेंबर २०२५ पासून सुरु झाला आहे.

Previous articleअहिल्यानगर जिल्ह्यावर जलसंकट; अनेक गावे गेली पाण्याखाली, सर्व नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
Next articleमृतक प्रकाश कावळे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.