Home बुलढाणा सोयाबीन पिकाला फळधारणा न लागल्याने शेतकऱ्यांनी घेतली कृषी अधिकारी कार्यालयावर धाव …!

सोयाबीन पिकाला फळधारणा न लागल्याने शेतकऱ्यांनी घेतली कृषी अधिकारी कार्यालयावर धाव …!

105
0

आशाताई बच्छाव

1001941041.jpg

सोयाबीन पिकाला फळधारणा न लागल्याने शेतकऱ्यांनी घेतली कृषी अधिकारी कार्यालयावर धाव …!

जळगाव (जा.) प्रकाश खंडागले :- खरंतर एका दाण्याची हजार दाणे करण्याची क्षमता ज्या शेतकऱ्यांमध्ये आहे त्याच शेतकऱ्यांच्या जीवावर काही बियाणे कंपन्या उठल्याचे दिसुन येत आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील मौजे टाकळी पारस्कार, आसलगाव बाजार, खांडवी व इतर काही गावातील शेतकऱ्यांनी फुले किमया (बालाजी) या सोयाबीन पिकाची लागवड केली होती मात्र त्या सोयाबीनच्या झाडाला शेंगाच न लागल्यामुळे अनेक शेतकरी हैराण झालेले आहे.

मुळात शेतकरी मोला-महागईची बियाणे आपल्या शेतामध्ये पेरतो त्यानंतर त्या पिकाला तळहाताच्या फोळा प्रमाणे जपुन त्याची प्रचंड अशी मेहनत करुन त्यापासुन चांगले उत्पन्न काढु व दोन पैसे मिळवु अशी अपेक्षा करतो मात्र या ठिकाणी बोगस बी-बियाणे कंपनीमुळे शेतकऱ्याला मरणाची दार खुली होतांना दिसत आहे.

सदर ही बाब आज दिनांक ११ सप्टेंबर २०२५ ला काही शेतकऱ्यांनी व युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी एकत्र येत शेतातील शेंगा न लागलेले सोयाबीनची झाडे घेऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे धाव घेतली.

त्यानंतर तालुका कृषी अधिकारी जाधव साहेब यांना शेतकऱ्यांनी आपल्या भावना सांगितल्या की आम्ही सोयाबीनची बियाणे कर्ज काढुन घेऊन त्याची भरपुर मेहनत करून लहानाची मोठी सुद्धा केली मात्र आज या सोयाबीनच्या झाडांना शेंगाच न लागल्याने आम्ही जिवन जगायचे तरी कशे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.त्यामुळे या विषयात आपण लक्ष घालुन संबंधित बियाणे कंपनीचे प्रतिनिधी,कृषी विभागाचे अधिकारी मिळुन पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत द्यावी.

अन्यथा आम्हा शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागेल असा इशारा या वेळेस देण्यात आला याप्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

Previous articleभोकरदन येथील गणेश मंडळाच्या वतीने जंगी कुस्त्याचे आयोजन.
Next articleसंभाजी ब्रिगेड स्थानिक स्वराज्य संस्था ताकदीने लढणार 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here