Home उतर महाराष्ट्र विहिरीत बिबट्या पडल्याने भितीचे वातावरण शेवडीपाड्यात वनविभागाकडून रेस्क्युः बिबट्याला सुखरूप काढले बाहेर;...

विहिरीत बिबट्या पडल्याने भितीचे वातावरण शेवडीपाड्यात वनविभागाकडून रेस्क्युः बिबट्याला सुखरूप काढले बाहेर; गावकऱ्यांचा सुटकेचा निश्वास

78
0

आशाताई बच्छाव

1001940452.jpg

विहिरीत बिबट्या पडल्याने भितीचे वातावरण
शेवडीपाड्यात वनविभागाकडून रेस्क्युः बिबट्याला सुखरूप काढले बाहेर; गावकऱ्यांचा सुटकेचा निश्वास
साक्री संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ-  पिंपळनेर वनविभागाच्या हद्दीतील शेवडीपाडा गावात एका दीड वर्षाच्या बिबट्याची विहिरीत पडल्याने चांगलीच धांदल उडाली होती. मात्र, वनविभागाच्या पथकाने तातडीने केलेल्या बचावकार्यामुळे बिबट्याचा जीव वाचला आणि गावकऱ्यांनीही सुटकेचा श्वास घेतला.
सकाळी विहिरीजवळून जात असताना दिगंबर गांगुर्डे यांना बिबट्याच्या मोठ्या किंकाळ्या ऐकू
आल्या. त्यांनी सरपंचांना माहिती दिल्यावर सर्वांनी पाहणी केली आणि बिबट्या विहिरीत पडल्याचे समजले. त्यानंतर तातडीने वनविभागाला कळवण्यात आले. बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
माहिती मिळताच, आरएफओ ओंकार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. यात वनपाल आर. व्ही. चौरे, वनपाल दयाराम सोनवणे, वनपाल संदीप मंडलिक, मेजर अनिल घरटे,
अमोल पवार, देवा देसाई, वरुण माळी, गुलाब बारीस, वनसेवक बाजीराव पवार, उज्जैन चौधरी आणि वन्यजीव संरक्षण संस्थेचे सलीम पटेल व त्यांचे सहकारी यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांनी जेसीबीच्या मदतीने पिंजरा विहिरीत उतरवला. काही मिनिटांतच बिबट्या पिंजऱ्यात शिरला आणि त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या यशस्वी बचावकार्यामुळे बिबट्याचे प्राण वाचले असून, वनविभागाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous articleरात्री अवैध वाळूच्या ट्रकसह 1520,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त !
Next articleआखाडे गावात लुपिन फाऊंडेशन मार्फत लुपिन पशुसंवर्धन शाळा संपन्न 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here