Home उतर महाराष्ट्र मुंबई–आग्रा महामार्गावर बॉम्बे इंदोर ट्रॅव्हल्स ला अचानक आग

मुंबई–आग्रा महामार्गावर बॉम्बे इंदोर ट्रॅव्हल्स ला अचानक आग

268

आशाताई बच्छाव

1001638409.jpg

मुंबई–आग्रा महामार्गावर बॉम्बे इंदोर ट्रॅव्हल्स ला अचानक आग

(ट्रॅव्हल्स संपूर्ण जळून खाक तर प्रवासी बाल बाल बचावलए)

(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)

धुळे –मुंबई-आग्रा महामार्गावर देवभाने गावाजवळ ट्रॅव्हल्सला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या ट्रॅव्हल्समध्ये सुमारे ३५ ते ३६ प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉल्फीन ट्रॅव्हल्स (एमपी ०९/बीजे ५५४४) ही ट्रॅव्हल्स मुंबईकडून इंदुरकडे जात होती. आज सकाळी ६ वाजून ३५ मिनीटांनी सदर ट्रॅव्हल्स मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने-कापडणे फाट्याजवळून जात असताना ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली. ही बाब चालक जावेद खान यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने तातडीने रस्त्याच्या बाजुला ट्रॅव्हल्स थांबवली. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरुप उतरविण्यात आले. पाहता पाहता आगीने संपूर्ण ट्रॅव्हल्सला कवेत घेतले. आगीची माहिती लागलीच धुळे कंट्रोल रुमला प्राप्त आली. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशामक बंबांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन, वाहन चालक राहुल पाटील, विनोद थोरात, लिडिंग फायरमन अतुल पाटील, फायरमन पांडूरंग पाटील, श्याम कानडे, कुणाल ठाकूर यांनी दोन बंबांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, आगीत ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. सदर ट्रॅव्हल्स ही मुंबई येथील नौशाद सिद्दीकी असे या ट्रॅव्हल्स मालकाचे नाव आहे

Previous articleसंजय देशमुख यांना मानाचा व सन्मानाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर
Next articleSBI बँक कडून गोंधनखेडा येथे शेतकरी संवाद मेळावा संपन्न..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.