Home उतर महाराष्ट्र नगरपालिकेच्या तलावात पाणी वाहणाऱ्या सिमेंटच्या पाईप मध्ये संडासचा मैला सोडणाऱ्या कुटुंबावर फौजदारी...

नगरपालिकेच्या तलावात पाणी वाहणाऱ्या सिमेंटच्या पाईप मध्ये संडासचा मैला सोडणाऱ्या कुटुंबावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा

109
0

आशाताई बच्छाव

1001629772.jpg

नगरपालिकेच्या तलावात पाणी वाहणाऱ्या सिमेंटच्या पाईप मध्ये संडासचा मैला सोडणाऱ्या कुटुंबावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी –शहराला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या तलावात पिण्याचे पाणी वाहणाऱ्या सिमेंटच्या पाईपलाईन मध्ये संडासचा मैला सोडणाऱ्या नालायक कुटुंबावर फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करावे या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये शिवसेनेचे नेते संजय छल्लारे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजीत लिपटे संदीप पवार भीम आर्मीचे सचिन ब्राह्मणे बहुजन समाज पार्टीचे सुरेश कांबळे यांच्या हस्ते मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना देण्यात आले त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की संपूर्ण श्रीरामपूर शहरामध्ये दूषित पाणी येत असल्याबाबत श्रीरामपूर नगर परिषदेला अनेक नागरिकांनी बऱ्याच दिवसापासून तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीची दखल घेऊन नळाला दूषित पाणी का? येते याचा शोध पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी घेत असताना त्यांना एका भागामध्ये श्रीरामपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात वाहणाऱ्या मेन पाईपलाईन मध्ये दोन तीन- कुटुंबांनी संडासचा मैला पाईपलाईन मध्ये सोडल्याचा कीळसवाणा गंभीर संताप जनक चीड आणणारा भयंकर माणुसकीला लाजवेल असा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला त्यानंतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना कळविले त्यानंतर संबंधित कुटुंबावर फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते परंतु तसे न करता त्यांना फक्त नोटीस देऊन त्यांना पाईपलाईन मध्ये सोडण्यात येणाऱ्या मैला बंद करण्यास सांगितले त्यामुळे त्या कुटुंबांनी तो मैला सोडायचे बंद केले परंतु गेली अनेक वर्षापासून त्या लोकांनी त्या ठिकाणी संडासचा मैला सोडल्यामुळे श्रीरामपूर शहरातील सर्व नागरिक मैला मिश्रित दूषित पाणी पिले आहे याला जबाबदार कोण अनेक वर्षापासून चाललेल्या या नीच कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे म्हणून ही बाब अत्यंत चिंताजनक खेदजनक किळसवाणी असून संपूर्ण श्रीरामपूर शहराला दूषित पाणी पाजून लोकांना रोगराईच्या घाईत लोटणाऱ्या कुटुंबाने संताप जनक प्रकार केलेला आहे कारण संपूर्ण श्रीरामपूर शहरातील लहान पासून ते मोठ्यापर्यंत सर्वच लोकांनी कित्येक दिवसापासून ते मैला मिश्रित पाणी पिली आहे असा प्रकार देशात कुठे घडला नसेल इतका मोठा महा भयंकर प्रकार श्रीरामपूर शहरांमध्ये घडलेला आहे जनावराला सुद्धा लाजवेल असा भयानक प्रकार करून फार मोठा गुन्हा त्या सैतानी आवलादिनीच्या कुटुंबांनी केला आहे म्हणून त्या कुटुंबावर श्रीरामपूर नगर परिषदेने फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांना जेलमध्ये टाकावे अन्यथा नगरपालिकेवर मोठा जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सुभाष त्रिभुवन गौतम यांनी दिला आहे

Previous articleश्रीरामपूरात आमदार गोपीचंद पडळकर यांचा ख्रिस्ती समूदायाकडून निवेदन देऊन निषेध
Next articleशब्दगंधचे उपक्रम नवोदितांसाठी प्रेरणादायी प्रा.ॲड.सुनील कात्रे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here