आशाताई बच्छाव
शेतकऱ्यांचे विनाविलंब व विना शर्त पिक कर्ज मंजूर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने इंडिया बॅकेसमोर निदर्शने .
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर –सद्यस्थितीत शेतमालाला हमीभाव मिळत नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असून राज्य शासनाच्या वतीने पीक विम्याचे धरसोडीचे धोरण सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पुरेसे प्रमाणात पीक कर्ज मिळण्याची आवश्यकता आहे.
परंतु पिक कर्जासाठी शेतकऱ्यांचे अर्ज आल्यानंतर ही राज्य शासनाचे त्वरित कर्ज मंजूर करण्याचे निर्देश असतानाही शेकडो अर्ज बँकेत प्रलंबित आहे. सदर अर्ज त्वरित निकाली काढण्याचे आवश्यक असताना हे अर्ज मुख्य शाखा व विभागीय शाखा यांच्याकडे पाठवून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. सिबिल व थकबाकी दाखवून अन्य काही तांत्रिक बाबी दाखवून पिक कर्ज नाकारले जात आहे.
या परिस्थितीत शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बँकांना जाब विचारण्यासाठी बँकांची शाळा हा आंदोलनात्मक कार्यक्रम राबवत असून शेतकऱ्यांचे पिक कर्ज त्वरित मंजूर करावे. कोणतेही तांत्रिक कारण दाखवून पिक कर्ज नाकारू नये, . शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला तर शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देऊन देगलूर येथील इंडिया बॅकेसमोर निदर्शने करण्यात आली यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख दयाल गिरी, उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर, मतदारसंघ संघटक राजेंद्र इंगळे खानापूरकर, मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, शहर प्रमुख संजय अण्णा जोशी, शहर संघटक भगवान जाधव, उपशहरप्रमुख मष्णाजी पैलावार उपशहरप्रमुख बाबुराव मिनकीकर, युवा सेना तालुका समन्वयक तथा शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, अल्पसंख्याक सेना तालुका प्रमुख युसुफभाई मिस्त्री, अल्पसंख्याक सेना शहर प्रमुख सय्यद हनुमिया मिरभाई, शिवसेना शहर समन्वयक विनोद सोनकांबळे, युवा सेना उपशहरप्रमुख गणेश चप्पलवार, युवा सेना उपशहरप्रमुख संदीप शिंदे, सर्कल प्रमुख सुभाष खुनेवाड, सर्कल प्रमुख शंकर जाधव हाळीकर आदी प्रमुख पदाधिकारी सह शेकडो शिवसैनिक, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते