Home अमरावती माझे बलिदान दिल पण मागे हटणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी माजी आमदार बच्चू...

माझे बलिदान दिल पण मागे हटणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी माजी आमदार बच्चू कडूंचा पवित्रा, अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात..

28
0

आशाताई बच्छाव

1001584340.jpg

माझे बलिदान दिल पण मागे हटणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी माजी आमदार बच्चू कडूंचा पवित्रा, अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात.. दैनिक युवा मराठा . पी.एन. देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. (मोझरी). माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बेमुदत अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे. अमरावती जिल्ह्यातील गुरुकुल मोझरी मध्ये तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात आंदोलनात बसले आहेत. आमची अंत्ययात्रा निघाली तरी 72 पण आम्ही मागे हटणार नाही अशी पवित्र माजी आमदार बच्चू कडू यांनी घेतली आहे. तसेच बाप मेला तरी चालेल पण नेता जिवंत राहिला पाहिजे ही व्यवस्था बदलण्यासाठी आंदोलन करत असल्याचेही ते म्हणाले या आंदोलनात त्यांच्या साथीला त्यांचे शेकडो कार्यकर्ते बसले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, दिवंगांना सहा हजार रुपये महिना मिळावा या सोबतच शेतात पेरणी ते कापणी पर्यंत सर्व कामे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदे अंतर्गत व्हावे सरकारने मच्छीमार आणि मेंढपाळ आणि दूध उत्पादनासाठी विशेष धोरण लागू करावे यासोबत ग्रामीण भागात घरकुल ची किंमत वाढवून घ्यावी. अशी मागणी बच्चू कडू यांनी केले आहे बच्चू कडू म्हणाले भरकटलेल्या व्यवस्था सुधारण्यासाठी मी आंदोलनात बसलो आहो माझा बाप मेला तरी चालेल पण नेता जिवंत राहिला पाहिजे अशी मानसिकता बदलणे गरजेचे आहे माझा शेतकरी राजा बाप जिवंत राहिला पाहिजे सोयाबीन आधी सहा हजारावर होते ते चार हजारावर गेले तुरीचे भाव 1000 ने कमी झाले पण तरीही कोणी पेटून उठत नाही कारण देशात अंतर्गत झुंज लावण्याचे प्रयत्न सुरू आहे. देशात सध्या कोणत्याही विषयावर जातीय रंग देऊन भांडणे लावण्याचा उद्योग सुरू आहे राज्यात मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद पेटवला गेला त्यामुळे आमच्या जीवन मरणाचा प्रश्न मागे पडत चालला आहे आमच्या डोक्यात हिंदू मुस्लिम वाद करण्याचा प्रयत्न आहे त्यावर रामबाण उपाय म्हणजे बच्चू कडू यांचे आंदोलन आहे. वेळ आली तर बच्चू कडू बलिदान करायला तयार आहे पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे असे माजी आमदार बच्चू कडू म्हणाले. सरकारी पैशांनी बहिणीचे मते विकत घेतली पण दुसऱ्याकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पडले आहेत सरकार सत्तेवर यावे यासाठी लाडकी बहीण योजना आणण्यात आली त्याच काळात मात्र शेतकऱ्यांच्या मालाचा भाव पडला होता सरकारला माहित आहे की बच्चू कडू मेला तरी फरक पडत नाही कारण त्यांनी जाती धर्म लोकांना गुंतवणूक ठेवले आहे अशी टीकाही बच्चू कडू यांनी सरकारवर केली.बच्चू कडू यांनी आंदोलना बसण्यापूर्वी ट्रॅक्टर वरून मिरवणूक काढली होती त्याआधी त्यांनी रविवारी दुपारी शहरातील संत गाडगेबाबाच्या समाज स्थळाचे दर्शन घेतले त्यानंतर ते ट्रॅक्टर ट्रॉलीवर स्वार झाले त्यांच्या ट्रॅक्टरमागे कार्यकर्ते दुचाकी स्वार होऊन मिरवणुकी सहभागी झाले अमरावती येथील पंचवटी चौक गर्ल्स हायस्कूल तो येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मिरवणूक काढण्यात आली.

Previous articleखडक माळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र मोफत आरोग्य तपासणी शिबिर
Next articleपोलीस ठाणे जाफराबाद पोलिसांची अवैध दारूची विक्री विरूद्ध मोठी कारवाई 6 लाख 44 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here