Home उतर महाराष्ट्र राहुरीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; आंदोलकांनी महामार्ग रोखला

राहुरीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; आंदोलकांनी महामार्ग रोखला

131

आशाताई बच्छाव

1001355394.jpg

राहुरीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; आंदोलकांनी महामार्ग रोखला                                अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी 

राहुरीतील बुवा सिंद बाबा तालमीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे आज (ता.२६) दुपारी लक्षात आले. त्यामुळे लोक संतप्त झाले. त्यांनी तत्काळ गावातून निषेध मोर्चा काढला. गावात व्यापारी, व्यावसायिक यांना बंदचे आवाहन केले. तत्काळ पूर्ण बाजारपेठ बंद झाली. आंदोलकांनी नगर-मनमाड महामार्ग रोखून धरला आहे. आरोपीला तत्काळ अटक केली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे , उपविभागीय पोलिस अधिकारी व बसवराज शिवपुजे पोलीस पथकासह घटनास्थळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.आंदोलकांनी टायर जाळण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे राहुरीत तणावपूर्ण शांतता आहे. आंदोलनस्थळी आमदार शिवाजी कर्डिले दाखल झाले आहेत. यावेळी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, हर्ष तनपुरे, नंदकुमार तनपुरे, सुनील भट्टड, भाऊ वराळे आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Previous articleमुंबईत आमदार संजय गायकवाड यांच्या छातीत चमक… पण चिंता नसावी!!
Next articleआताची मोठ्ठी बातमी गुगल पे, फोन पे अचानक बंद? देशातील अनेक युजर्सनी केली तक्रार…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.