आशाताई बच्छाव
,
रंकाळा सुभोभिकरणांतर्गत बसविलेले विद्युत दिवे व खांब यांची नासधूस करण्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा.
कोल्हापूर (अविनाश शेलार ब्युरो चीफ)
कोल्हापूर शहराचा रंकाळा तलाव हा मानबिंदू असून याच्या सुशोभिकरणाच्या कामामुळे रंकाळ्याचे सौंदर्य खुलून दिसत आहे. हा नवा रंकाळा पाहणेसाठी हजारों पर्यटक रोज रंकाळ्याला भेट देत आहेत. पण अलिकडे रंकाळ्यावर विद्युत दिवे व खांब यांची दुरावस्था करण्याचा विघ्न संतोषी लोकांनी सुरुवात केली आहे हा प्रकार सुरू झाले आहेत. परवाच झालेल्या घटनेतून हे सिद्ध होत आहे. पण ही घटना घडून गेलेनंतर महापालिका प्रशासनाने कोणतीच कारवाई केलेचे दिसत नाही. या परिसरात असणाऱ्या सी. सी. टीव्हीची मदत घेऊन संबंधितांवर प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल करून वेळीच चाप लावला पाहिजे. कोट्यवधी रूपये निधी खर्च करून कोल्हापूरचा इतिहास दाखविणाऱ्या चित्रशिल्पाप्रमाणे दुरावस्था होऊ नये याची काळजी महापालिकेने घ्यावी. रंकाळ्यावर विक्रीसाठी येणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याकडून रंकाळा घाण करण्याचे प्रकार घडत आहे. त्यांचेवर आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाई व्हावी. तसेच रंकाळा सुरक्षेसाठी सुरक्षा गार्ड ची संख्या वाढवावी. देवकर पाणंद येथून जे प्रदुषण होऊन रंकाळा दुषित होतो, त्यावर त्वरीत युद्ध पातळीवर उपाय योजना करावी.एखादी छोटी घटना म्हणून या घटनेकडे गांभिर्याने कारवाई केली नाही तर महापालिका प्रशासनावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत . तरी जनभावना लक्षात घेऊन प्रशासनाने कारवाई करावी ही मागणी अशी मागणी रंकाळा बचाव कृती समिती ने केली आहे
निवेदन देण्यासाठी किशोर घाटगे श्रीकांत आपणास मनोळे
निलेश हंकारे सौ.सुजाता पाटील(भाजप) शीलाताई माने (हिंदू महासभा ) विकास सुर्वे अजय शेलार सोनवणे प्रशांत पांडुरंग पाटील राजेंद्र शिवाजी तोरस्कर कपिल कृष्णात नाळे उदय बाबा भोसले
अर्जुन आंबी योगेश केरकर प्रसन्न शिंदे निशिकांत सरनाईक प्रकाश घाटगे विनय कांदेकर सुमन पाले आदी उपस्थित होते