Home जळगाव चाळीसगावात तरूणाचे अपहरण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न – 6 जणांवर गुन्हा

चाळीसगावात तरूणाचे अपहरण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न – 6 जणांवर गुन्हा

20
0

आशाताई बच्छाव

1000559261.jpg

चाळीसगावात तरूणाचे अपहरण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न – 6 जणांवर गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- वडिलांच्या मारेकऱ्यांचा मित्र असल्याच्या कारणातून 25 वर्षीय तरूणाचे अपहरण करून पिस्तुलचा धाक दाखवून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शहरात उघडकीस आली असून या प्रकरणी तिघांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, कल्पेश सुनील पाटील रा. नवा मालेगाव रोड, राखुंडेनगर, चाळीसगाव हा संययित अनिकेत महेंद्र मोरे याच्या वडिलांच्या मारेकर्‍यांचा मित्र आहे या कारणावरून तिघांनी कल्पेश यास पिस्तुलचा धाक दाखवून खून करण्यासाठी अपहरण करून चापटाबुक्क्यांनी, काठीने तसेच बेल्टने मारहाण केली. तसेच त्यास वाहनात टाकून बाहेरगावी घेऊन जात आता तुला जीवंत सोडत नाही असे म्हणत अनिकेतने त्याच्याकडील बागायत रूमालने फास देवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
तर दोघांनी सुमित कोठे आहे असे सांगत नाही म्हणून याला जीवंत सोडू नका असे म्हणून दोन्ही बाजुंनी रूमाल ओढून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर इतर अनोळखींनी काठीने मारहाण केली.
ही घटना दि.17 रोजी रात्री 8 वाजता नवा मालेगाव रोड, रस्त्यावर घडली.
या प्रकरणी कल्पेश सुनील पाटील याच्या फिर्यादीवरून संशयित अनिकेत महेंद्र मोरे, कृष्णा जिभाऊ झाल्टे,मेहूल मोरे सवर्र् रा. चाळीसगाव व इतर तीन अनोळखी इसम यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम 109,137(2),140(1),142,60 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी हे करीत आहेत.

Previous articleचाळीसगावात तरूणाचे अपहरण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न – 6 जणांवर गुन्हा
Next articleचाळीसगाव मधील सकल हिंदू समाजाच्या निवेदनानंतर बबडी शेखवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here