Home जळगाव रिक्षा घेण्यासाठी दोन लाख रूपये आणले नाही म्हणून विवाहीतेचा छळ

रिक्षा घेण्यासाठी दोन लाख रूपये आणले नाही म्हणून विवाहीतेचा छळ

90
0

आशाताई बच्छाव

1000486817.jpg

रिक्षा घेण्यासाठी दोन लाख रूपये आणले नाही म्हणून विवाहीतेचा छळ
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- रिक्षा घेण्यासाठी माहेरून दोन लाख रूपये आणले नाही या कारणावरून विवाहीतेचा शारीरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील क्रांतीचौक, सुयश लॉन्सजवळ, चाळीसगाव परीसरातील माहेर असलेल्या 23 वर्षीय तरुणीचा नामपूर ता. बागलान जि.नाशिक येथील अरविंद्र नरेंद्र निकुंभ याचेशी 2018मध्ये झाला. लग्नानंतर काही महिन्यांनी सासरच्या लोकांनी काहीना काही कुरापती काढून विवाहीतेचा छळ केला. सासुसार्‍यांच्या सांगण्यावरून पती तिरस्कार करीत. पती कामानिमीत्त पुण्यात गेल्यावर तिथेही छळ सुरूच होता.
त्यानंतर रिक्षा घेण्यासाठी माहेरून 2 लाख रूपये आणून दे अन्यथा नांदवणार नाही असे सांगून मारहाण, शिवीगाळ करत शारीरीक व मानसिक छळ सुरूच ठेवला. या छळाला कंटाळून विवाहीतेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
विवाहीतेच्या फिर्यादीवरून पती अरविंद नरेंद्र निकुंभ, सासू शोभा नरेंद्र निकुंभ, सासरे नरेंद्र पोपट निकुंभ, दीर उमाकांत नरंेंद्र निकुंभ सर्व रा. आदर्शनगर, विठ्ठल मंदिर, नामपूर ता. बागलाण जि. नाशिक, नणंद कविता समाधान सोनवणे, नंदोई समाधान सोनवणे दोन्ही रा. नाशिक यांच्या विरोधात भादंवि 498अ, 323,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleराजरत्न आंबेडकर यांच्या आंदोलनाला सरकारने आडकाठी आणू नये याकरिता त्यांच्या समर्थनार्थ
Next article: ठाण्यातील अर्जुन टॉवरला भीषण आग
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here