Home रत्नागिरी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षपदी शरद मोरे

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षपदी शरद मोरे

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20220824-WA0042.jpg

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षपदी शरद मोरे                     रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार शरद मोरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना अमरावती जिल्हयात २५वर्षापूर्वी स्थापन झाली असून दव्युत्तर तिचे कार्य महाराष्ट्रसह देशातील चार राज्यात सुरू आहे. संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सूने, उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष मुनीर खान यांनी रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी शरद मोरे यांची निवड केली आहे. गेली ३० वर्ष पत्रकारिता यापिका मनोज वर्षाव क्षेत्रात असलेल्या शरद मोरे यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून आपली कारकिर्द सुरू करून त्यांनी विविध दैनिकात जिल्हा प्रतिनिधी, उपसंपादक, निवासी संपादक, कार्यकारी संपादक म्हणून काम केल्यानंतर लांजा- राजापूर वृत्त आणि कोकण सहकार या दोन साप्ताहिक वृत्तपत्राचे समूह संपादक असून राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातून प्रकाशित करीत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना येणाऱ्या अडचणीची त्यांना जाण असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Previous articleपटवर्धन हायस्कूलच्या कार्तिकी भुरवणे हिला जलतरणमध्ये कांस्यपदक
Next articleआरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याचा मंत्रालयाच्या छतावरून आत्महत्येचा प्रयत्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here