Home महाराष्ट्र अखेर ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख जाहिर – १५ जानेवारी रोजी होणार मतदान

अखेर ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख जाहिर – १५ जानेवारी रोजी होणार मतदान

127
0

राजेंद्र पाटील राऊत

अखेर ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख जाहिर – १५ जानेवारी रोजी होणार मतदान

विशेष प्रतिनधी – राजेश एन भांगे

मुंबई, दि.११ – राज्यातील माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तारीख अखेर जाहीर झाली असून, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी यासंदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना पत्राद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे गावच्या पुढाऱ्यांनीही आता कंबर कसली असून उमेदवारांची शोधा शोध सुरू केली आहे.

राज्यात माहे एप्रिल 2020 ते मार्च 2020 पर्यंत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतिच्या निवडणुका पार पडणार होत्या मात्र कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या निवडणुकांचा नियोजित कार्यक्रम रद्द करून, त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होत असल्याने या निवडणुका जानेवारी 2020 मध्ये घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दि.11 डिसेंबर रोजी एक पत्रक काढून दिल्या आहेत. ज्यात 15 डिसेंबर रोजी तहसीलदार यांनी निवडणूक नोटीस प्रसिध्द करणे, दिनांक 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2020 पर्यंत नामनिर्देशन पत्र मागविणे, 31 डिसेंबर रोजी नामनिर्देशन छाननी करणे, दिनांक 4 जानेवारी नामनिर्देशन पत्र मागे घेणे व निवडणूक चिन्ह नेमून देणे, दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी मतदान, दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी मत मोजणी व दिनांक 21 रोजी जिल्हाधिकारी कार्यलयामार्फत निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणे, असा एकूण ग्रामपंचायत निवडणूकांचा कार्यक्रम राहणार आहे. त्यामुळे आता राजकीय रंगत गावच्या राजकारणात यापुढे दिसून येणार आहे.

Previous articleप्रहार दिव्यांग क्रांती संघटना देगलूरच्या वतीने निवेदन
Next articleदुर्गुळे सनराइझर्स संघ अंतिम सामण्यात दाखल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here