Home सांस्कृतिक पक्षीय मतभेद विसरून पुन्हा उभा करू ‘रायगड’, तातडीने 100 कोटी रुपयांची मदत...

पक्षीय मतभेद विसरून पुन्हा उभा करू ‘रायगड’, तातडीने 100 कोटी रुपयांची मदत जाहीर

450
0

🛑 पक्षीय मतभेद विसरून पुन्हा उभा करू ‘रायगड’, तातडीने 100 कोटी रुपयांची मदत जाहीर 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 5 जून : ⭕ दोन दिवसांपूर्वी आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसली. राजगड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे. वादळामुळे क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी चक्रीवादळाच्या नुकसानाची पाहणी केली. रायगड जिल्ह्यासाठी तातडीने 100 कोटी रुपयांची मदतही मुख्यमंत्र्यानी जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सकाळी मुंबईहून मांडवा अलिबाग येथे आगमन झालं. त्यांच्यासमवेत मंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली पालकमंत्री आदिती तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्याकडून आणि करण्यासाठी आज अलिबागच्या दौऱ्यावर आहेत. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या थळ गावातील नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.

त्याठिकाणी किती मोठं नुकसान झालंय हे हळूहळू समोर येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण ठळक मुद्दे

# आपत्ती काळात जीवित हानी होऊ नये यासाठी प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने प्राणहानी झाली,

# हे नुकसान भरून येणार नाही, शासनाने मदत दिली पण यापुढे जीवितहानी होता कामा नये यासाठी शासन प्रयत्न करणार .

# कोरोना संकट आहेच,काळजी घेतली त्यात वादळ आले,आता पुन्हा नव्याने सुरू करायचे आहे,

# प्रथम झाडांची साफसफाई करावी,आवश्यक त्या सर्व सुविधा आणि मदत केली जाईल,

# आज मी आपले कौतुक करण्यासाठी आलो आहे,

# संकट सर्वांसाठी असते,पक्ष मतभेद विसरून आपण एकत्र काम करून रायगड जिल्हा पुन्हा उभा करू.

# घरांची पडझड झाली आहे त्याना तातडीने मदत करणार.

# मच्छिमारांचे जे नुकसान झाले आहे त्याबद्द्ल शासन मदत देणार⭕

Previous articleअजोय मेहता यांची हॅट्रिक
Next articleशहरातील ३१ उद्याने सुरू!प्रतिबंधित क्षेत्रातील उद्याने बंद राहणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here