Home आंतरराष्ट्रीय भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या १३ दहशतवाद्यांना कंठस्नान

भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या १३ दहशतवाद्यांना कंठस्नान

162
0

🛑 भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या १३ दहशतवाद्यांना कंठस्नान 🛑
मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

जम्मू-काश्मीर :⭕जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक झाली. यात एक दहशतवादी ठार झाला आहे. जम्मू काश्मीरच्या नौशेरा येथील भारताच्या नियंत्रण रेषेवर काही दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पुलवामा जिल्ह्यातील त्राळमधील सामोह येथे अतिरेकी आणि सैन्य यांच्यात चकमक झाली आणि त्यात आतापर्यंत एक दहशतवादी ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. दहशतवाद्यांविरूद्ध सुरक्षा दलाचे ऑपरेशन अजूनही सुरू आहे.

यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या कारवाईत १३ अतिरेकी ठार झाले होते. जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन पाकिस्तानी अतिरेक्यांचा सैन्याने सोमवारी खात्मा केला होता. त्याचबरोबर २८ मेपासून सुरू झालेली घुसखोरी रोखण्याच्या मोहीमेत आतापर्यंत चार दिवसात १३ दहशतवादी ठार झाले आहेत.

सैन्याच्या अधिकाऱ्याने ‘आज तक’ या वृत्तसंस्थेला सांगितलं की २८ मे पासून घुसखोरीविरोधी मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत भारतीय सैन्याने पुंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या किमान १० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तत्पूर्वी, नौशेरा सेक्टरमध्ये सोमवारी तीन अतिरेकी ठार झाल्याचं सैन्याने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.⭕

Previous articleसमता नगर विभागात वाॅर्ड नं.२५ च्या नगरसेविका सौ.माधुरी योगेश भोईर यांनी विभागात गरजु लोकांना धान्यवाटप
Next articleदेशातील एकूण कोरोना बळींपैकी 94 टक्के मृत्यू फक्त 8 राज्यात!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here