Home मुंबई वाढत्या काहिलीने मुंबईकर त्रस्त

वाढत्या काहिलीने मुंबईकर त्रस्त

86
0

🛑वाढत्या काहिलीने मुंबईकर त्रस्त🛑
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई ⭕ दहा वर्षांतील तिसऱ्या क्रमांकाच्या तापमानाची नोंद
लॉकडाउनमुळे घरी असलेल्या मुंबईकरांना यंदाचा उन्हाळा कमी तापदायक वाटला तरी वाढते तापमान काहिली करणारे ठरले. मुंबईत शुक्रवारी झालेली तापमानाची नोंद, ही गेल्या दहा वर्षांतील तिसऱ्या क्रमांकाची ठरली हे विशेष.

मुंबईमध्ये शुक्रवारी पहाटे झालेल्या तापमानाच्या नोंदीनुसार सांताक्रूझ येथे किमान तापमानाचा पारा २९ अंश सेल्सिअस होता. या आधी २६ मे आणि २४ मे रोजीही किमान तापमान सांताक्रूझ येथे २९ अंशांपर्यंत पोहोचले होते. हे मे महिन्यातील गेल्या १० वर्षांमधील सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचे तापमान आहे. सन २०१० आणि २०१५ मध्ये हा पारा २९.७ अंशांपर्यंत पोहोचला होता. तर सन २०१६ मध्ये मे महिन्यातील सर्वाधिक किमान तापमान २९.२ अंश सेल्सिअस होते. शुक्रवारी सकाळी किमान तापमानात वाढ झाली. त्यानंतर काही काळ ढगाळ वातावरण होते. शनिवारीही आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

तापमानात वाढ
शुक्रवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३४.९ होते तर कुलाबा येथे ३५.२ अंश सेल्सिअस होते. कुलाबा येथे सरासरीपेक्षा १.३ तर सांताक्रूझ येथे सरासरीपेक्षा १.४ अंशांनी हे तापमान अधिक होते. सांताक्रूझ येथे आर्द्रता ६३ टक्के तर कुलाबा येथे ७६ टक्के नोंदवली गेली.

मान्सूनची चिन्हे
वाढत्या आर्द्रतेमुळे मान्सूनच्या आगमनाची सकारात्मक चिन्हे मुंबईकरांना आता जाणवू लागली आहेत. पुढील २४ तासांमध्ये हे वातावरण असाच असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानंतर हळुहळू कमाल तापमानात थोडी घट होईल. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर कोकण, दक्षिण कोकण तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथे रविवारी तुरळक सरींची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोमवारी आणि मंगळवारी ही व्यापकता अधिक वाढण्याचेही पूर्वानुमान वर्तवण्यात आले आहे.

Previous articleआयआयटीचे माजी विद्यार्थी उभारणार करोनासाठी मेगालॅब
Next articleदेशातील ‘या’ १३ शहरांमध्येच लॉकडाऊन ५ कायम राहणार?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here