Home उतर महाराष्ट्र दुचाकी पार्किंगच्या वादातून एकास मारहाण

दुचाकी पार्किंगच्या वादातून एकास मारहाण

132

आशाताई बच्छाव

1001270568.jpg

दुचाकी पार्किंगच्या वादातून एकास मारहाण.             अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी 

दुचाकी पार्किंगच्या वादातून सात जणांच्या टोळक्याने एकाला धारदार शस्त्र व लाकडी दांडक्याने हल्ला करून जखमी केले. सुदर्शन मोहन गोहेर (वय ४४, रा. वडारवाडी रस्ता, शहा फेब्रीकेशनच्या मागे, नागरदेवळे, ता. नगर) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यश पुरण वैद्य, प्रवीण बिल्लु घावरी, नीतेश बिल्लु घावरी, रोहन प्रवीण घावरी, बिल्लु घ्यासी घावरी, रश्मी नीतेश घावरी, रजणी प्रवीण घावरी (सर्व रा. भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गुरूवारी दुपारी यश वैद्य याने फिर्यादीच्या घरासमोर दुचाकी लावली. त्यावेळी फिर्यादीने त्याला दुचाकी काढण्यास सांगितली असता यश वैद्य याने थांब, तुला दाखवतो असे म्हणत अन्य सहा साथीदारांच्या मदतीने फिर्यादीवर हल्ला केला. लाकडी दांडक्याने तसेच चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार केले.

Previous articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू
Next articleमाजी नगराध्यक्षा योगीताताई पिपरे यांनी केली आदिवासी मुलींच्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.