आशाताई बच्छाव
घर व घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत मशालचिन्ह पोहोचवा
– जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांचे आवाहन
बदनापूर मतदार संघातील पदाधिकार्यांची बैठक संपन्न
जालना, दि. ५(प्रतिनिधी दिलीप बोंडे)- आगामी निवडणुकीत उमेदवार कोणीही असो. परंतु
आजच्या घडीला आपला उमेदवार केवळ मशाल आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी
धनुष्यबाण विरोधकांनी चोरला. पक्षाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर हे चिन्ह
सर्वच नागरिकांना माहीत नसल्यामुळे आपल्या मतावर परिणाम झाला. तर आमचे
धनुष्यबाण हे चिन्ह समजून नागरिकांनी मतदान केल्याने विरोधकांना त्याचा
फायदा झाला. त्यामुळे आता मशाल चिन्ह हे प्रत्येक मतदारापर्यंत जाणे
आवश्यक आहे. आज रोजी आपला उमेदवार ठरलेला नाही परंतु आपले चिन्ह मशाल हे
समजून प्रत्येकाने कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर
अंबेकर यांनी केले.
बदनापूर मतदारसंघातील पदाधिकार्यांची महत्वाची बैठक शिवसेना भवन येथे
शनिवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विभाग प्रमुख, तालुकाप्रमुख,
उपतालुकाप्रमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकार्यांची उपस्थिती होती. यावेळी
व्यासपीठावर माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हासंघटक भानुदास घुगे,
तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, तालुकाप्रमुख अशोकबर्डे, कैलास चव्हाण,
बाबुराव पवार यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना
जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की,
पुढे बोलताना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की, पक्ष प्रमुख
उद्धवजी ठाकरे हे मागील अनेक वर्षांपासून अन्यायाच्या विरोधात संघर्ष करत
आहेत. पक्षाचे नाव, पक्षाचे चिन्ह गेले तरी त्यांनी हिम्मत न हारता नव्या
जोमाने पक्ष बांधणी केली पक्ष उभा केला. सोयाबीन, कपाशी यासह
शेतकर्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, सामान्य नागरिकांना न्याय
मिळावा .