आशाताई बच्छाव
४५ विहिरीचे अधिग्रहण, आठ गावाची तहान ११ टँकरवर. पाणी टंचाईची त्रीवता वाढली.
_________
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
एप्रिल महिन्यातील रखरखात उन्हामुळे जल स्तोत्र कोरडे पडत असल्याने अनेक गावांना कोरड लागली आहे. पाणीटंचाईची त्रिवता वाढल्याने तात्पुरता उपाययोजना म्हणून सध्या स्थितीत खाजगी ४५ विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले तर ११ गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करून तहान भागिले जात आहे. पावसाळ्यात चांदूरबाजार वगळता १३ही तालुक्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे जमिनीचे पूर्णभरण न झाल्याने मार्च पश्चात त भूजल स्तरात कमी येत आहे. त्यामुळे अनेक गावाचे जल स्तोत्र आता कोरडे पडत असल्याने पाणीटंचाई ची दहा हक्क वाढली आहे. त्या तुलनेत आचारसंहितेत अडकल्याने अनेक गावे तहानले आहे. आयोगाचे निर्देशानुसार केवळ टँकर सुरू करणे व विहिरीचे अधिग्रहण यालाच मुभा असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. प्रशासनाच्या साप्ताहिक अहवालानुसार सध्या स्थिती अमरावती तालुक्यात ७, भातकुली १, चांदुर रेल्वे ३, नांदगाव खंडेश्वर १६, अचलपूर ३, मोर्शी ११ तसेच वरुड व चिखलदरा तालुक्यात प्रत्येकी दोन खाजगी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. टँकरवर सध्या स्थितीत चांदुर रेल्वे तालुक्यात सावंगी मगरापूर चिखलदरा तालुक्यातील बेला (सलोना), मोथा, बहादपूर, गौलखेडा बाजार, धामकटडोह येथे प्रत्येकी१ तर खडीमल येथे चार टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या गावांमध्ये जल जीवन मिशनची कामे अद्यापही पूर्ण झालेली नसल्याचे तात्पुरती उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.