आशाताई बच्छाव
सकल हिंदू समाज तर्फे
जाहीर निषेध आंदोलन उत्स्फूर्ततेने पार पडले! कोल्हापूर अविनाश शेलार ब्युरो चीफ
आज दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी, सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर येथे जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये हिंदूंवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य आणि उत्स्फूर्त निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले.
या आंदोलनाला कोणतेही औपचारिक निमंत्रण न देता, फक्त समाजमाध्यमांद्वारे आणि मना-मनातील संतापाच्या लाटेने असंख्य हिंदू बांधवांनी स्वयंस्फूर्त सहभाग नोंदवला. हातात भगवे ध्वज, घोषणांनी दुमदुमलेला परिसर आणि राष्ट्रभक्तीने भारलेली हवा, हे दृश्य अत्यंत प्रेरणादायी होते.
प्रत्येक हिंदूच्या मनातील रोष आणि संघर्षाची भावना प्रकट करताना, २०x४० फूट आकाराचा पाकिस्तानचा झेंडा आणि दहशतवाद्यांच्या प्रतिमा जमलेल्या हिंदू बांधवांनी पायाखाली तुडवत जाळल्या. “हिंदू शांत असतो, पण जागा झाला की रणभेरी वाजवतो!” या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला.
देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी एकत्र आलेल्या हिंदू समाजाने ठाम संदेश दिला आहे की धर्मद्रोही, हिंदूद्वेष्टा आणि देशद्रोही यांना हिंदू समाज कधीही माफ करणार नाही.
सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व भगिनी-बंधूंना, तरुणांना आणि ज्येष्ठांना मनःपूर्वक धन्यवाद!
सकल हिंदू समाजाचे पुढील सदस्य उपस्थित होते.
गजानन तोडकर, उदय भोसले, अभिजीत पाटील, निरंजन शिंदे, योगेश केळकर, सुजित चव्हाण, महेश जाधव, विकास जाधव, किशोर घाटगे, प्रसन्न शिंदे, आनंदराव पवळ, मनोहर सोरप, उमेश नरके, अर्जुन आंबे विकी जरग, शिवानंद स्वामी, अमय भालकर, नंदू घोरपडे, अश्विनी घोपुडगे, रामभाऊ मेथे, तेजस्विनी पार्टी, बाबा पार्टी, निलेश हंकारे, बंडा साळुंखे, नाना कदम, अमर जाधव, दिलीप गायकवाड, गायत्री राऊत, राजू तोरस्कर, शीला माने, अनिल दिंडे, पांडू पाटील, आर डी पाटील, रोहित खराडे, विनायक माने, संतोष लाड, शंतनु मोहिते,
त्याचप्रमाणे विविध संघटनांचे प्रमुख तसेच सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.