Home उतर महाराष्ट्र टिटाणेतील साडेतीन कोटींची जलजीवन योजना नित्कृष्ट दर्जाची! ग्रामपंचायतीचे नेते सुभाष माळचे यांची...

टिटाणेतील साडेतीन कोटींची जलजीवन योजना नित्कृष्ट दर्जाची! ग्रामपंचायतीचे नेते सुभाष माळचे यांची तक्रार

602
0

आशाताई बच्छाव

1001247157.jpg

संदीप वसंतराव पाटील तालुका प्रतिनिधी                   साक्री ,:-साक्री तालुक्यातील               ग्रुपग्रामपंचायतचे नेते सुभाष निंबा माळचे यांनी टिटाणे गावासाठी मंजूर झालेली जनजीवन मिशन पाणीपुरवठा योजना ही 2022 तर 2023 यावर्षी मंजूर होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली ही योजनेचा एकूण इस्टिमेट 359 लक्ष रुपये एवढा असून कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असा आहे वारंवार सूचना देऊनही कामामध्ये कुठेही गुणवत्ता दिसून येत नाही यासंदर्भात आज रोजी दिनांक 17 2 2025 रोजी संबंधित बांधकाम अभियंता पवार साहेब यांना पत्र देऊन कामाची चौकशी करून कामाचे गुणवत्ता राखण्यासाठी प्रयत्न करावेत असा अर्ज ग्रुपग्रामपंचायतचे नेते सुभाष माळचे यांनी दिले तसेच बांधकाम विभागाचे आर एम पवार यांना पण ईसरडे वसंत नगर आंबेमोहोर आणि पन्हाळी पाडा टिटाणे या गावांतर्गत झालेले रस्ते ठक्कर बाप्पा योजनेतून आणि दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आणि आमदार निधीतून जेवढे ही रस्ते या गावांमधून झालेले आहेत त्या संपूर्ण रस्त्यांची अवस्था अतिशय निकृष्ट अशी आहे त्या रस्त्यांचे कामाचे इस्टिमेट मागवण्यासाठी अर्ज दिलेला आहे ग्रामपंचायतीचे विरोधी पक्ष नेते सुभाष मार्च यांनी सांगितले आहे की संपूर्ण ग्रामपंचायतची मागील 2019 पासून तर 2025 मार्चपर्यंत आलेला विविध योजनेमधून किती निधी आला आणि कोणते कामे केली या संदर्भात संपूर्ण चौकशी करण्याचे त्यांनी सांगितले तसेच मागील सात वर्षापासून ची संपूर्ण ग्रामपंचायतची चौकशी करण्याचे ठरवलेले आहे प्रत्येक योजनेचे पुरावे गोळा करून संबंधित गटविकास अधिकारी यांना सादर करून चौकशी करण्याचे त्यांनी सांगितले वित्त आयोग पेसा ग्रामनिधी पाणीपुरवठा ठक्कर बाप्पा या संपूर्ण विभागामार्फत आलेला निधीचा वापर कसा झाला व किती निधी आला याची चौकशी त्यांनी लावलेली आहे असे त्यांनी सांगितले

Previous articleजवाहर उर्दू हायस्‍कूल व कनिष्ठ महाविद्यालय मोताळाच्‍या विद्यार्थ्यांचे आरोग्‍य प्रंचड धोक्‍यात….
Next articleनामदार गिरीषभाऊ महाजन यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना दिलेला शब्द खरा केला,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here