Home नाशिक स्वतःच्याच जमिनीवर घरकुल बांधण्यास आदिवासी कुटुंबावर अमानुष अत्याचार..!!

स्वतःच्याच जमिनीवर घरकुल बांधण्यास आदिवासी कुटुंबावर अमानुष अत्याचार..!!

118
0

आशाताई बच्छाव

1001233815.jpg

स्वतःच्याच जमिनीवर घरकुल बांधण्यास आदिवासी कुटुंबावर अमानुष अत्याचार..!!
(ताहाराबाद,प्रतिनिधी)बागलाण तालुक्यातील करंजाड येथील आदिवासी समाजातील दयाराम दौलत शिंदे हे अनेक वर्षांपासून चिंचबारी शिवारातील गट नंबर 82 मधील त्यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीवर झोपडी करून राहतात. त्यांना नुकतेच ग्रामपंचायत करंजाड मार्फत शबरी आदिवासी घरकुल योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे.म्हणून काल दिनांक 11/2/2025 रोजी सकाळी ठीक 11:30 वाजेच्या दरम्यान दयाराम शिंदे हे पत्नी बागुबाई,मुलगा संजय,सून मंगल व परिवारातील इतर सदस्यांसोबत नवीन घराचा पाया खोदण्यासाठी आपल्याच वडिलोपार्जित जमिनीवर गेले असता त्याठिकाणी काशिनाथ सहादू देवरे व त्याचा मुलगा नानू काशिनाथ देवरे हे येऊन दमबाजी करून शिवीगाळ करू लागले, म्हणून दयाराम शिंदे व संजय शिंदे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता नानू देवरे याने उद्धटपणे जातीवाचक शिवीगाळ सुरु केली.
दयाराम शिंदे यांच्या मालकीच्या शेतजमिनीतून पाटचारी देखील गेली आहे, शासनाकडून त्यांना शेतजमिनीचा मोबदला म्हणून काही रक्कम दिल्याची पावती आहे,सातबारा नावावर असून इतर लोकांच्या जाचाला व अन्यायाला आदिवासी कुटुंब अनेक वर्षांपासून बळी पडत आहे.म्हणून या आदिवासी कुटुंबाची एकच मागणी आहे की स्वतःची जमीन असून आम्हाला शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळू द्यावा व आमचीही झोपडीची अवस्था बदलावी म्हणून आम्हाला प्रशासन व शासनाकडून न्याय हवा अशीच मागणी हे आदिवासी कुटुंब शासन दरबारीं सध्या करत आहे.

Previous articleतुमसरमध्ये सट्टापट्टी अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई
Next articleमानवी आरोग्यास घातक असलेला गांजा शेती करणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here