आशाताई बच्छाव
जंक फुड खाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण – प्रा. बी.वाय. कुलकर्णी
जालना, (प्रतिनिधी दिलीप बोंडे)-आजच्या युगात प्रत्येक जण धावपळीत आहे.
त्यामुळे आरोग्याकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. या धावपळीत प्रत्येक जण
जंक फुड खाण्याकडे कळत न कळत वळत असतो. परंतु त्याचे परिणाम त्याच्या
आरोग्यावर गंभीरपणे होतांना दिसून येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी
घ्यावी व घरचा आहार घ्यावा, असे प्रा. बी.वाय. कुलकर्णी आवाहन त्यांनी
केले.
-जालना शहरातील शांतीनिकेतन नर्सिग कॉलेजमध्ये आयोजित कॉलेजच्या पहिल्या
बॅचच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थी व
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर
संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर,गणेश
महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर, उद्योजक महेंद्र देशपांडे, माजी जि.प.
सदस्य हरिहर शिंदे, प्रा. राम कदम, शहरप्रमुख बाला परदेशी, दुर्गेश
काठोठीवाले, संचालक अश्विन अंबेकर, प्राचार्या लियंता निर्मल, प्रा.
धनंजय सोनवणे, पांडूरंग काळे यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना प्रा. बी.वाय. कुलकर्णी म्हणाले की, कोरोना काळात
डॉक्टर व परिचारिका त्यांचे कार्याचे महत्व सर्वांनीच जाणले. आपल्या
जीवावर उदार होवून त्यांनी लोकांचे प्राण वाचविण्यासाठी कठोर परिश्रम
केले. आज या महाविद्यालयात शिकून परिचारिका होत असलेल्या
विद्यार्थ्यांनीही अत्यंत चांगले ज्ञान घेवून भावी आयुष्यात रुग्णांची
चांगली सेवा करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजक तथा जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी जालना
शहरातील अभ्यासु व्यक्तीमत्व व शहराचे वैभव असलेले प्रा. बी.वाय.
कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून शांतीनिकेतन नर्सिग
कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी बोलतांना सांगितले.